मुंबई: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा निकाल ९ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांचे निकाल स्पष्ट झाले असून राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटानेही लक्षणीय कामगिरी केली आहे. मात्र या सर्व निकालांमध्ये पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीचा निकाल राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे.
खेडमध्ये ठाकरे गटाचे एकहाती वर्चस्व
पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीत एकूण १६ जागांसाठी निवडणूक झाली होती. यापैकी तब्बल १२ जागांवर ठाकरे गटाच्या उमेदवारांनी विजय मिळवत एकहाती सत्ता प्रस्थापित केली. जिल्हा परिषद निवडणुकीतही ठाकरे गटाने पाच जागांवर बाजी मारत आपली ताकद दाखवून दिली आहे.
‘गड आला पण सिंह गेला’
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांनी खेड पंचायत समिती जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. खेड-आळंदी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काळे यांनी कोणत्याही परिस्थितीत पंचायत समिती हातातून जाऊ नये यासाठी रणनीती आखली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि त्यांच्या समर्थक उमेदवारांनी विजय मिळवला.मात्र या निवडणुकीत उभ्या असलेल्या त्यांच्या भगिनी राजश्री जैद यांचा पराभव झाला. त्यामुळे ‘गड आला पण सिंह गेला’ अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजप-शिंदे गटाचा जोर निष्फळ
खेड पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी भाजप आणि शिंदे गटानेही जोरदार प्रचार केला होता. अनेक बड्या नेत्यांच्या सभा झाल्या. मात्र ठाकरे गटाने स्थानिक पातळीवर संघटनबळाच्या जोरावर विजय खेचून आणला. विशेष म्हणजे खेड तालुक्यात कोणत्याही मोठ्या नेत्याची सभा न होता देखील ठाकरे गटाने प्रभावी कामगिरी केली.
या विजयामुळे पुणे जिल्ह्यात ठाकरे गटाने आपली पाळेमुळे अधिक मजबूत करण्यास सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. खेडचा निकाल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात महत्त्वाचा ठरणार असल्याचे मानले जात आहे.
मुंबई: महाराष्ट्रातील उच्च व तंत्रशिक्षण व्यवस्थेचा कारभार ढिसाळ झाल्याचा आरोप करत ॲड. अमोल मातेले यांनी…
ठाणे: सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे…
ठाणे: ठाण्यातील चितळसर-मानपाडा येथील म्हाडाच्या गृहप्रकल्पातील घरांच्या किमतीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे निर्देश दिले…
शिरूर (सुनिल जिते): ग्राहकांचा बँकेवरील विश्वास आणि सुरक्षित गुंतवणुकीला मिळणारा प्रतिसाद यामुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती…
शिरूर: निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील नारायण रामचंद्र पवार (वय ६२) यांचे रविवारी (ता. ९)…
सोलापूर : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर हल्ला करण्यासाठी त्यांच्या वाहनचालकाला पैशांचे…