महाराष्ट्र

खेड पंचायत समितीवर ठाकरे गटाचा झेंडा; १६ पैकी १२ जागांवर दणदणीत विजय

मुंबई: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा निकाल ९ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांचे निकाल स्पष्ट झाले असून राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटानेही लक्षणीय कामगिरी केली आहे. मात्र या सर्व निकालांमध्ये पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीचा निकाल राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

खेडमध्ये ठाकरे गटाचे एकहाती वर्चस्व

पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीत एकूण १६ जागांसाठी निवडणूक झाली होती. यापैकी तब्बल १२ जागांवर ठाकरे गटाच्या उमेदवारांनी विजय मिळवत एकहाती सत्ता प्रस्थापित केली. जिल्हा परिषद निवडणुकीतही ठाकरे गटाने पाच जागांवर बाजी मारत आपली ताकद दाखवून दिली आहे.

‘गड आला पण सिंह गेला’

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांनी खेड पंचायत समिती जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. खेड-आळंदी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काळे यांनी कोणत्याही परिस्थितीत पंचायत समिती हातातून जाऊ नये यासाठी रणनीती आखली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि त्यांच्या समर्थक उमेदवारांनी विजय मिळवला.मात्र या निवडणुकीत उभ्या असलेल्या त्यांच्या भगिनी राजश्री जैद यांचा पराभव झाला. त्यामुळे ‘गड आला पण सिंह गेला’ अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

भाजप-शिंदे गटाचा जोर निष्फळ

खेड पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी भाजप आणि शिंदे गटानेही जोरदार प्रचार केला होता. अनेक बड्या नेत्यांच्या सभा झाल्या. मात्र ठाकरे गटाने स्थानिक पातळीवर संघटनबळाच्या जोरावर विजय खेचून आणला. विशेष म्हणजे खेड तालुक्यात कोणत्याही मोठ्या नेत्याची सभा न होता देखील ठाकरे गटाने प्रभावी कामगिरी केली.

या विजयामुळे पुणे जिल्ह्यात ठाकरे गटाने आपली पाळेमुळे अधिक मजबूत करण्यास सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. खेडचा निकाल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात महत्त्वाचा ठरणार असल्याचे मानले जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सराईत आरोपींच्या पोलिसांनी दोन तासांत आवळल्या मुसक्या

शिंदोडी (तेजस फडके) निमोणे (ता. शिरुर) येथे घोडनदीच्या पात्रातील पाण्याच्या बांधावरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट…

40 मिनिटे ago

शालेय शिक्षण विभागाचा गुगलसोबत करार; राज्यातील ४ लाख शिक्षकांना एआय प्रशिक्षणाचा लाभ

मुंबई: राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग…

3 तास ago

पावसाच्या विलंबाची कारणे जाणून घेण्यासाठी जय पवारांची हवामान केंद्राला भेट

मुंबई: महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवार यांनी मुंबईतील प्रादेशिक…

3 तास ago

शिवसैनिकच बाळासाहेबांचे खरे वारस; हा फक्त ट्रेलर, पिक्चर अजून बाकी; एकनाथ शिंदे

शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; विधान परिषदेत महायुती सर्व १७ जागा…

4 तास ago

नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द; ‘उत्तर महाराष्ट्राच्या विकासावर घाला’ – सत्यजीत तांबे

नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची…

4 तास ago

गुनाटमधील वाळूच्या Video मुळे प्रशासनाची धावपळ; पंचनामा झाला, पण गुन्हा दाखल होणार का…?

शिंदोडी (तेजस फडके): गुनाट (ता. शिरुर) येथील सरकारी गायरान जमिनीवर अवैधरित्या वाळूचा साठा केला असल्याचा…

7 तास ago