महाराष्ट्र

मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून नवा वाद; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली: भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या अप्रकाशित पुस्तकावरून राजकीय वाद चिघळला आहे. पुस्तक अद्याप प्रकाशित झाले नसल्याचे प्रकाशन संस्था पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने स्पष्ट केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मुद्द्यावरून मोठा गदारोळ झाला होता. दरम्यान, पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने निवेदन जारी करत म्हटले की, “मनोज नरवणे यांच्या पुस्तकाच्या कोणत्याही प्रती छापलेल्या नाहीत. पुस्तकाचे सर्व हक्क आमच्याकडे असून ते अद्याप प्रकाशित, वितरित किंवा विक्रीसाठी उपलब्ध केलेले नाही.” तसेच पुस्तकाचा कोणताही भाग सार्वजनिक करण्यात आलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अनधिकृतरीत्या प्रसारित होणाऱ्या प्रती कॉपीराइट उल्लंघन असल्याचा इशाराही प्रकाशन संस्थेने दिला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले, “एकतर जनरल नरवणे खोटं बोलत आहेत किंवा पेंग्विन पब्लिकेशन्स खोटं बोलत आहे. मात्र मला वाटत नाही की नरवणे खोटं बोलतील.” त्यांनी नरवणे यांच्या ट्विटचा उल्लेख करत पुस्तकासाठी लिंक दिल्याचा दावा केला. “जर पुस्तक प्रकाशित झालेलं नाही, तर ते अ‍ॅमेझॉनवर कसं उपलब्ध आहे?” असा सवाल करत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. पुस्तकात नमूद केलेल्या काही बाबी सरकारसाठी अडचणीच्या असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, पुस्तकाच्या अनधिकृत प्रती लीक झाल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडे एफआयआर नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे.

‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या आत्मचरित्रात जनरल नरवणे यांनी आपल्या ४० वर्षांच्या लष्करी कारकिर्दीतील अनुभव मांडले आहेत. विशेषतः २०२० मधील भारत-चीन तणाव, पूर्व लडाखमधील परिस्थिती आणि ‘अग्निपथ’ भरती योजनेबाबत झालेल्या चर्चांचा उल्लेख पुस्तकात असल्याचे वृत्त आहे. या मुद्द्यांवरूनच वाद निर्माण झाला आहे.

दरम्यान, संरक्षण मंत्रालय आणि लष्कराकडून पुस्तकाची छाननी सुरू असल्याने त्याचे प्रकाशन रखडल्याचे सांगितले जाते. संरक्षण दलाच्या नियमांनुसार सेवेशी संबंधित संवेदनशील माहिती प्रसिद्ध करण्यासाठी केंद्र सरकारची पूर्वपरवानगी आवश्यक असते.

एकीकडे प्रकाशन संस्था पुस्तक प्रकाशित झाले नसल्याचा दावा करत असताना दुसरीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबईत हरवलेली चिमुरडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…

18 तास ago

प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर अ.भा.वि.प.चा संताप; जबाबदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…

18 तास ago

‘आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही’! होमगार्डचा आक्रोश; ४० हजार कुटुंबांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…

18 तास ago

साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या बदल्यांवर वाद; शिवसेनेची चौकशीची मागणी

मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…

18 तास ago

एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…

18 तास ago

काँग्रेसचे ‘पुतना मावशीचे प्रेम’; महिलांच्या प्रश्नांवर दुटप्पी भूमिका; डॉ. नीलम गोऱ्हे

महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…

18 तास ago