महाराष्ट्र

ठाकरे गटाचं हत्यार सभागृहाबाहेर; राजकीय गणितं बदलणार का

मुंबई: ठाकरे गटाचे आक्रमक नेते, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपुष्टात आला असून विधान परिषदेत त्यांच्या निरोप समारंभाने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. २०१९ मध्ये छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आलेले दानवे, २०२२ मध्ये शिंदे बंडानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी विराजमान झाले. त्या काळात त्यांनी ठाकरे गटाचे जहाल वकिलीत्व केले. सरकारवर सडकून टीका, फडणवीस-शिंदेंना सवाल, आणि सभागृहात ठामपणे ठाकरे गटाचा आवाज – यामुळेच ते उभे राहिले होते.

पुन्हा विधान परिषदेत कसे येणार

सध्याच्या राजकीय गणितांनुसार, त्यांच्या जागेसाठी पुन्हा निवडणूक होण्यासाठी छत्रपती संभाजीनगर, जालना महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होणे आवश्यक आहे. त्या निवडणुका झाल्याशिवाय विधान परिषदेच्या जागेवर निवडणूक होणार नाही. याचा अर्थ दानवेंना किमान काही महिने तरी बाहेरच राहावे लागणार आहे. त्याचबरोबर, विधानसभेतील सदस्यांमधून निवडून येण्याचा पर्यायही तितकाच कठीण. कारण, ठाकरे गटाकडे सध्या केवळ २० आमदारांचे संख्याबळ आहे, आणि विधान परिषदेच्या जागेसाठी ४० ते ४५ आमदारांची आवश्यकता आहे. त्यामुळे विधानसभेतील मार्गही प्रश्नचिन्हाखाली आला आहे.

राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, ठाकरे गटाचा हा आक्रमक आवाज काही काळासाठी तरी सभागृहातून गायब होणार, त्यामुळे सरकारला कदाचित सूट मिळू शकते. मात्र, अंबादास दानवे हे केवळ सभागृहापुरते मर्यादित नाहीत, तर ते रस्त्यावरही ठाकरे गटाचे मोठे हत्यार ठरू शकतात. आता पाहावे लागेल, ठाकरे गट त्यांना कोणते नवे भूमिकेवर नेतंय, की विधान परिषदेतील पुनरागमनासाठी निवडणुकांचे कंबर कसणार? पण एक मात्र निश्चित – अंबादास दानवे यांचा राजकीय लढा थांबणारा नाही… सध्या तरी वाट पाहावी लागणार.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शाळा-महाविद्यालयांच्या दारातच नशेचा बाजार; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, मावा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम…

9 तास ago

दरडग्रस्त भागांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे…

11 तास ago

डिजिटल परिवर्तनामुळे तंत्रशिक्षण प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम; ई-गव्हर्नन्स पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रात प्रशासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम, उत्तरदायी आणि डेटा-आधारित करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात…

11 तास ago

शिरुर तालुक्यात सामाईक इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या भावाकडून मारहाण

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सामाईक वापरातील इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या…

14 तास ago

शिरुर तालुक्यातील भीषण अपघातात पत्नीच्या मृत्यू प्रकरणी; पतीवर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू…

14 तास ago

भाजलेल्या हरभऱ्याचे फायदे

चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून…

18 तास ago