महाराष्ट्र

अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाला जबर धक्का; घातपात की अपघात यावर तीव्र चर्चा

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावी नेते अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात निधन झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना दाट धुक्यामुळे विमान धावपट्टीचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहितीत सांगण्यात आले असले, तरी या घटनेमागे घातपात आहे का, यावर राज्यभर तीव्र चर्चा सुरू झाली आहे.

अजित पवार मुंबईहून बारामतीकडे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी निघाले होते. विमानाने दोनदा लँडिंगचा प्रयत्न करून ‘यू-टर्न’ घेतल्याची माहिती आहे. अखेर लँडिंगदरम्यान धावपट्टीच्या बाजूच्या खड्ड्यात विमान घसरून पेट घेतल्याचे सांगण्यात आले.

अपघातस्थळी स्वतः जाऊन पाहणी करणारे खा. शरद पवार यांनी ‘धावपट्टीजवळ खड्डा कसा काय असू शकतो?’ असा प्रश्न उपस्थित केला. या विधानानंतर संशय अधिक गडद झाला असून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या मृत्यूमागे राजकीय कारस्थान असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनीही विरोधी नेत्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. मात्र शरद पवार यांनी हा निव्वळ अपघात असल्याचे सांगत चौकशी अहवाल येईपर्यंत तर्कवितर्क टाळण्याचे आवाहन केले आहे.

अजित पवार हे महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहिलेले नेते होते. त्यांनी सहा वेळा हे पद भूषवले असून विविध सरकारांमध्ये महत्त्वाची खाती सांभाळली. रोखठोक शैली, प्रशासनावर मजबूत पकड आणि ‘कामाचा माणूस’ अशी त्यांची ओळख होती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच आणि महाविकास आघाडीत त्यांच्या पुनरागमनाची शक्यता असताना झालेले हे निधन अनेक प्रश्न निर्माण करणारे ठरत आहे.

अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आक्रमक, निर्णयक्षम आणि प्रभावी नेतृत्व अचानक हरपले असून, या अपघातामागील सत्य काय आहे, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

2 तास ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

12 तास ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

12 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

12 तास ago

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

12 तास ago

मोदींनी सोनम वांगचुकांची भेट का घेतली नाही?; राम मंदिर चोरीवर भाजप-आरएसएसवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…

13 तास ago