महाराष्ट्र

सरपंचाची खुर्ची रिकामी होणार! राज्यातील 14,237 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचे आदेश

मुंबई: राज्यातील ग्रामीण राजकारणात मोठा बदल घडणार असून येत्या काळात राज्यातील तब्बल 14 हजार 237 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले जाणार आहेत. ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपत असताना निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या खुर्च्या काही काळासाठी रिकाम्या राहणार आहेत.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आधीच रखडल्या आहेत. त्याच धर्तीवर आता जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीत कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही किमान सहा महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या काळात लोकप्रतिनिधी नसून सरकारी प्रशासक ग्रामपंचायतींचा कारभार पाहणार आहेत.

ग्रामविकास विभागाचा मोठा निर्णय

ग्रामविकास विभागाने 14 ऑगस्ट 2020 च्या शासन निर्णयाचा आधार घेत प्रशासक नियुक्तीचे आदेश नुकतेच जारी केले आहेत. या निर्णयानुसार ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्यानंतर निवडणुका होईपर्यंत प्रशासक नेमण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

विभागनिहाय ग्रामपंचायतींची संख्या

छत्रपती संभाजीनगर विभाग: 4,134 ग्रामपंचायती

पुणे विभाग: 2,870 ग्रामपंचायती

नाशिक विभाग: 2,476 ग्रामपंचायती

अमरावती विभाग: 2,451 ग्रामपंचायती

नागपूर विभाग: 1,508 ग्रामपंचायती

कोकण विभाग: 798 ग्रामपंचायती

निवडणुका का लांबल्या?

आरक्षणाचा पेच अद्याप सुटलेला नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामपंचायतींची मुदत संपत असताना निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नसल्याने प्रशासक नियुक्तीचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.

ग्रामीण राजकारणावर परिणाम

या निर्णयामुळे ग्रामीण भागात ‘प्रशासक राज’ सुरू होणार असल्याची चर्चा आहे. गावच्या विकासकामांवरील निर्णय आता लोकनियुक्त सरपंचाऐवजी प्रशासक घेणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि स्थानिक नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढण्याची शक्यता असून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांबाबत पुढील निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शाळा-महाविद्यालयांच्या दारातच नशेचा बाजार; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, मावा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम…

15 तास ago

दरडग्रस्त भागांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे…

17 तास ago

डिजिटल परिवर्तनामुळे तंत्रशिक्षण प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम; ई-गव्हर्नन्स पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रात प्रशासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम, उत्तरदायी आणि डेटा-आधारित करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात…

17 तास ago

शिरुर तालुक्यात सामाईक इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या भावाकडून मारहाण

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सामाईक वापरातील इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या…

20 तास ago

शिरुर तालुक्यातील भीषण अपघातात पत्नीच्या मृत्यू प्रकरणी; पतीवर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू…

21 तास ago

भाजलेल्या हरभऱ्याचे फायदे

चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून…

24 तास ago