मुंबई: कळवा भागात (दि. १६) रोजी एका कार्यक्रमात शिवसेनेच्या पदाधिकारी अयोध्या पोळ यांच्यावर काही लोकांनी हल्ला केला. या घटनेची शिवसेना उपनेत्या व विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे.
याबाबत त्यांनी दूरध्वनीवरून माहिती घेऊन संवाद साधला आणि त्यांना दिलासा दिला. या घटनेमध्ये दोषी असणाऱ्या व्यक्तींवर त्वरीत कारवाई करण्याबाबत त्यांनी स्थानिक पोलिसांकडे मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर ‘राजकारणात काम करणाऱ्या सर्वच महिलांना सन्मान आणि सुरक्षा मिळाली पाहिजे. समाजात, राजकरणात महिलांचे प्रतिनिधित्व एका बाजूला वाढत असताना अशा प्रकारच्या घटना होणे हे अत्यंत चुकीचे आहे.
राजकारणात काम करणाऱ्या महिलांना विशेष सुरक्षा मिळाली पाहिजे. अयोध्या पोळ यांच्यावरील हल्ल्याची तक्रार पोलिसांनी घेतली पाहिजे, यातील दोषींची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी,’ असे त्यांनी म्हटले आहे.
बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…
मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर…
मुंबई: शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम बंगाल व आसाम विधानसभा…
मुंबई: महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. नुकत्याच समोर आलेल्या…
मुंबई: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना मतदारांनी दाखवलेला विश्वास हा “आदरणीय अजितदादांच्या पवित्र…
पालकांची वाढती चिंता, समाजजागृती आणि यंत्रणांच्या जबाबदारीवर पुन्हा प्रश्नचिन्ह मुंबई: महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या सलग…