महाराष्ट्र

तुमच्या भागातील लाईट गेल्यास या नंबरवर द्या मिसकॉल…

संभाजीनगर: महाराष्ट्रातल्या महावितरणच्या ग्राहकांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. तुमच्या भागात कुठल्याही कारणाने वीजपुरवठा खंडित झाला असेल, तर फक्त एका मिस् कॉलवर तक्रार नोंदवून विशेष म्हणजे त्यानंतर लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत होणार आहे. महावितरणने त्यासाठी मोबाइल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. टोल फ्री क्रमांक, महावितरणचे ॲप आणि संकेत स्थळावरून सुद्धा तक्रार नोंदवता येणार आहे.

या नंबरवर द्या मिस् कॉल

ग्राहकांनी वीजपुरवठा खंडित झाल्याची मिस कॉलद्वारे तक्रार करण्यासाठी 022-50897100 हा क्रमांक असून महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

अशी करा तक्रार

ज्यांनी नोंदणी केली नसेल त्यांनी मोबाईलवर MREG टाईप करून त्यानंतर स्पेस देऊन आपला बारा अंकी ग्राहक क्रमांक टाईप करावा आणि 9930399303 या क्रमांकावर ‘एसएमएस’ पाठवावा. ग्राहकांना www.mahadiscom.in या संकेतस्थळावरील कंज्युमर पोर्टल, महावितरणचे मोबाईल ॲपवरही नोंदणी करता येईल. तसेच 1912, 1800-212-3435, 1800-233-3435 या टोल-फ्री क्रमांकांवर मोबाईल क्रमांक नोंदवता येतो.

येथे करा तक्रार

टोल फ्री क्रमांक: 1912, 1800-212-3435, 1800-233-343

मिस कॉल: 022-50897100 (केवळ नोंदणीकृत मोबाईलवरून)

एसएमएस: 9930399303 क्रमांकावर NOPOWER <स्पेस> <बारा अंकी ग्राहक क्रमांक> हा संदेश पाठवा

महावितरणचे मोबाईल ॲप

महावितरणचे ग्राहकांना आवाहन

पावसाळ्यामध्ये वादळवाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यावर ग्राहकांनी 15 ते 20‍ ‍मिनिटे वाट पाहूनच महावितरणला माहिती द्यावी. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी तातडीने धाव घेतात. संबं‍धित अभियंते व कर्मचाऱ्यांना वारंवार फोन केल्यास त्यांच्या कामात व्यत्यय येण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांनी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना फोन करण्याऐवजी टोल फ्री क्रमांक, मोबाईल ॲप, एसएमएस किंवा मिस कॉल सुविधेचा वापर करावा; जेणेकरून महावितरण कर्मचाऱ्यांना काम करणे सुलभ होईल आणि वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करता येईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबईत ‘खड्डेमुक्ती’वर ९० कोटींचा प्रश्नचिन्ह; अनियमिततेच्या आरोपांवरून प्रशासनाला निवेदन

मुंबई: मुंबई महानगरपालिका चे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील कथित अनियमितता व संभाव्य…

2 तास ago

पुण्यातील ILS विधी महाविद्यालय शुल्क वसुली प्रकरणी चौकशी; विद्यार्थ्यांना 6% व्याजासह परतावा

मुंबई: विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत पुणे येथील आय.एल.एस. विधी महाविद्यालयातील बेकायदेशीर शुल्क वसुली प्रकरणी…

3 तास ago

शेतीच्या वादातून चांडोह येथे हाणामारी; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चांडोह येथील सालकरमळा परिसरात शेतीच्या नांगरणीवरून दोन गटांमध्ये वाद होऊन…

4 तास ago

पत्नीवर लोखंडी फायटरने हल्ला; पतीविरुद्ध शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): पोटगीच्या वादातून संतापाच्या भरात पतीने पत्नीवर लोखंडी फायटरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना…

4 तास ago

महा-ऑनलाईन सर्व्हर ठप्प; विद्यार्थ्यांची गैरसोय वाढली

शिरूर (अरुणकुमार मोटे): राज्य शासनाच्या महत्त्वाच्या महा-ऑनलाईन पोर्टलचा सर्व्हर गेल्या तीन दिवसांपासून पूर्णपणे बंद असल्याने…

4 तास ago

मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा

मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…

23 तास ago