मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवंडे यांच्यावरील शाईहल्ला, धक्काबुक्की आणि शिवीगाळीची घटना ही भ्याड मानसिकतेचे प्रतीक असून हा वारकरी संप्रदायाचा अपमान असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. हल्लेखोरांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
गांधी भवन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले की, विकास लवांडे हे वारकरी संप्रदायातील समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा विचार पुढे नेणारे कार्यकर्ते आहेत. वारकरी संप्रदायात मनुवादी विचार वाढत असल्याची त्यांनी व्यक्त केलेली चिंता या हल्ल्यामुळे खरी ठरल्याचे दिसून येते.
सपकाळ यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना सांगितले की, मनुवादी विचारसरणीमुळे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच अनेक संत-महात्म्यांना त्रास सहन करावा लागला. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरील अन्यायाचाही त्यांनी उल्लेख केला.
नाशिकमधील TCS प्रकरणावर बोलताना सपकाळ यांनी संबंधित एफआयआर सार्वजनिक करण्याची मागणी केली. या प्रकरणाच्या माध्यमातून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. “कायद्याने त्याचे काम करावे, मात्र या विषयाचा राजकीय वापर थांबवावा,” असेही ते म्हणाले.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले शिवसेना नेते अंबादास दानवे आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांनी गांधी भवन येथे हर्षवर्धन सपकाळ यांची सदिच्छा भेट घेतली. काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार मानले. यावेळी महाविकास आघाडीच्या आगामी राजकीय वाटचालीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
मुंबई: नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत…
मुंबई: देशात लोकशाही आणि संविधान धोक्यात असून संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्वांनी एकजुटीने संघर्ष करण्याची…
नवी दिल्ली: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या कथित…
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय पाटील यांनी पत्रकारांशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जाहीर दिलगिरी व्यक्त करत…
शिरुर (तेजस फडके) शिंदोडी गावात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळेस आकाशात ड्रोनसदृश्य वस्तू फिरत असल्याचे…
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक राजकारण, अर्थव्यवस्था आणि सामरिक क्षेत्रात प्रभावी झेप…