महाराष्ट्र

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणे, ही सक्षम आणि ज्ञानसमृद्ध समाजाच्या उभारणीची भक्कम पायाभरणी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

शिक्षक दिनानिमित्त पुण्यातील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार, अध्यक्ष चषक तसेच शिष्यवृत्ती परीक्षेतील राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आदर्श शिक्षकांचा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्राच्या विकासात शिक्षणाला नेहमीच अग्रक्रम देण्याची भूमिका अजितदादांची होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार, आधुनिक आणि जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे, हे त्यांचे स्वप्न होते. पुणे मॉडेल स्कूल, डिजिटल शिक्षण आणि विविध आधुनिक शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून हा विचार पुढे नेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

पुणे ही शिक्षणाची पंढरी आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेला शिक्षणाचा समृद्ध वारसा आज जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून पुढे नेला जात आहे. या शाळांमध्ये शिकणारी मुले ही ग्रामीण महाराष्ट्राची खरी ताकद आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान न देता कौशल्याधारित आणि मूल्याधारित शिक्षणासोबत डिजिटल शिक्षण आणि AI साक्षरतेची जोड देणे आवश्यक आहे, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.

गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची परंपरा अशीच पुढे न्यावी आणि शिक्षकांनी ज्ञानदानाचे हे पवित्र कार्य अधिक जोमाने सुरू ठेवावे, यासाठी सुनेत्रा पवार यांनी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

10 मिनिटे ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

25 मिनिटे ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

29 मिनिटे ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

34 मिनिटे ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

44 मिनिटे ago

शिरुर; उरळगावच्या शेतकऱ्यांची तंत्रज्ञानाकडे वाटचाल; पीक पद्धतीवर आधारित प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

न्हावरे (अक्षय टेमगिरे) आधुनिक शेतीत बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन उत्पादनवाढ, खर्चात बचत आणि शेती…

2 तास ago