महाराष्ट्र

ऑनलाईन गेमिंगचा घातक विळखा! तीन सख्ख्या बहिणींनी गमावलं आयुष्य, पालकांमध्ये भीती

गाझियाबाद: ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनामुळे लहान मुलांचे आयुष्य धोक्यात येत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. गाझियाबादमधील भारत सिटी सोसायटीत तीन सख्ख्या अल्पवयीन बहिणींनी ऑनलाईन गेमच्या आहारी जाऊन टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

मृत मुलींचं वय अनुक्रमे १६, १४ आणि १२ वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार या तिन्ही बहिणींना गेल्या दोन वर्षांपासून टास्क-आधारित कोरियन लव्ह गेमचं तीव्र व्यसन लागलं होतं. याच नादामुळे त्यांनी शाळेत जाणंही बंद केलं होतं आणि त्या पूर्णपणे मोबाईल गेमच्या दुनियेत अडकल्या होत्या.

मंगळवारी रात्री उशिरापर्यंत त्या मोबाईलवर गेम खेळत असल्याचं कुटुंबीयांच्या लक्षात आलं. यावेळी घरच्यांनी त्यांना मोबाईल बाजूला ठेवण्यास सांगितलं, त्यावरून घरात वाद झाला. काही वेळातच, घरचे झोपेत असताना तिघींनी खोलीचा दरवाजा आतून बंद करून बाल्कनीतून खाली उडी घेतली. या घटनेत तिन्ही बहिणींचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून त्यात,”मम्मी, बाबा, आम्हाला माफ करा. आम्हाला जो गेम सोडायला सांगत होतात, तो आम्हाला खूप प्रिय होता”असा मजकूर लिहिलेला आढळून आला आहे. या चिठ्ठीमुळे ऑनलाईन गेमिंगचं व्यसन किती टोकाचं असू शकतं, हे पुन्हा स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, अशाच एका घटनेत भोपाळ येथील अंश साहू या विद्यार्थ्याने मोबाईल गेमच्या व्यसनामुळे आत्महत्या केल्याची माहिती आहे. अंशला ‘ब्लू व्हेल’ आणि ‘फ्री फायर’ गेमचं व्यसन होतं. गेममधील टास्कचा मानसिक ताण आणि आर्थिक खर्चामुळे कुटुंबीयांनी त्याच्याकडून मोबाईल काढून घेतला होता. मात्र, तरीही त्याने टोकाचा निर्णय घेतल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं.

या घटनांमुळे ऑनलाईन गेमिंगवरील नियंत्रण, पालकांची भूमिका आणि मुलांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सरकारकडून अशा घातक गेम्सवर बंदी घालण्याची मागणी होत असतानाच, पालकांनीही मुलांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवणं, त्यांच्याशी संवाद वाढवणं आणि गरज असल्यास मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.ऑनलाईन जग जितकं आकर्षक आहे, तितकंच ते धोकादायकही ठरत असल्याचं या घटनांमधून स्पष्ट झालं आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

16 तास ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

16 तास ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

16 तास ago

मोदींवर हल्ल्याच्या वक्तव्यावरून काँग्रेसवर शिंदेंची टीका

ठाणे: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात भारतातही पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर…

16 तास ago

वारकरी संप्रदायावर वादग्रस्त वक्तव्य; एकनाथ शिंदे यांचा विकास लवांडे यांना इशारा

मुंबई: राज्यात वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

16 तास ago

कामगारांवर लोखंडी रॉडने हल्ला; महिलेशी गैरवर्तन

शिरूरमध्ये कामाठीपुरा येथील आश्रमशाळेत खळबळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील कामाठीपुरा…

16 तास ago