मुंबई: भविष्यातील महाराष्ट्र कसा असावा, याचा सविस्तर विकास आराखडा मांडण्यात आला असून “समृद्ध, सक्षम आणि संवेदनशील महाराष्ट्र” ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारा हा दृष्टिकोन असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या आराखड्यात सर्वसमावेशक व लोककेंद्रित विकास हा प्रमुख मुद्दा असून, विकासाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची भूमिका मांडण्यात आली आहे. शहर–ग्रामीण दरी कमी करत आदिवासी, महिला, शेतकरी, कामगार आणि युवकांना समान संधी देण्यावर भर देण्यात आला आहे.
आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करत प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, परवडणारी व वेळेवर वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी ग्रामीण भागात सुसज्ज रुग्णालये, डिजिटल हेल्थ सेवा आणि आपत्कालीन यंत्रणा सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार या त्रिसूत्रीवर आधारित धोरणातून महाराष्ट्र नोकरी मागणारा नव्हे, तर नोकरी देणारा राज्य बनेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. उद्योगाभिमुख शिक्षण, स्टार्ट-अप संस्कृती आणि नवकल्पनांना चालना देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
महिलांसाठी सन्मान, सुरक्षितता आणि स्वावलंबन या तीन स्तंभांवर आधारित धोरण राबवण्याची भूमिका मांडली आहे. लाडकी बहीणसारख्या योजनांचा विस्तार, स्वयंरोजगार आणि सुरक्षित सार्वजनिक व्यवस्था ही भविष्यातील महाराष्ट्राची ओळख असेल, असे नमूद करण्यात आले.
यासोबतच आधुनिक पायाभूत सुविधा, स्मार्ट शहरे, हरित ऊर्जा, जलसंवर्धन, प्रदूषण नियंत्रण आणि शाश्वत शेती यांद्वारे पर्यावरणस्नेही महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.
शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, हमीभाव, कृषी प्रक्रिया उद्योग आणि पाणी व्यवस्थापनावर भर देण्यात आला आहे. तसेच पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त आणि लोकाभिमुख प्रशासन हे विश्वासार्ह शासनाचे लक्षण ठरेल, असे मत मांडण्यात आले.
महाराष्ट्राची सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक एकात्मता जपत वारकरी संप्रदाय, कला, साहित्य, क्रीडा व लोककलेला प्रोत्साहन देण्यावरही भर देण्यात आला आहे. केंद्र–राज्य समन्वयातून मोठ्या प्रकल्पांना गती देत विकासाचा वेग वाढवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.भविष्यातील महाराष्ट्र केवळ आर्थिकदृष्ट्या प्रगत नव्हे, तर मानवी मूल्यांनी समृद्ध, सामाजिकदृष्ट्या न्याय्य आणि आत्मनिर्भर असावा, असा ठाम संदेश या विकास आराखड्यातून देण्यात आला आहे.
मदत करणाऱ्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांकडून सत्कार शिक्रापूर (): शिक्रापूर पोलीस ठाण्याने गेल्या दीड महिन्यापासून शिक्रापूर,…
न्हावरे (अक्षय टेमगिरे): मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाची प्रकृती अचानक…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…
पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…
घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…