महाराष्ट्र

कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून या मंत्र्यांना पवित्र करून घ्यावे

कृषिमंत्री यांचा राजीनामा न घेणे म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रती सरकार असंवेदनशील

मुंबई: राज्याचे कृषिमंत्री शेतकऱ्यांविरोधात विधान करतात, विधी मंडळात कामकाज सुरू असताना रम्मीचा गेम खेळतात आणि सरकार बेजबाबदार मंत्र्यांचा राजीनामा घेत नाही, कृषिमंत्री कोकाटे यांचा राजीनामा न घेणे म्हणजे सरकार शेतकऱ्यांच्याप्रती असंनवेदनशील असल्याचे स्पष्ट झाले, अस काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

मुंबईत पत्रकार परिषदेला संबोधित करताना वडेट्टीवार म्हणाले, राज्याचे गृहराज्यमंत्री डान्सबार चालवतात, एका मंत्र्यांकडे पैश्याचा बॅगा सापडतात पण तरीही यांची पाठराखण जर करण्यात येत असेल तर या सर्व मंत्र्यांवर गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे. लाडकी बहिण म्हणायचे आणि बारमध्ये बहिणींना नाचवायचे असा किळसवाणा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात कधी झाला नव्हता, अशी टीका विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केली. नागपूर मधील बार मध्ये अधिकारी फाईली घेऊन बसतात, गडचिरोलीचे ते अधिकारी असल्याची माहिती समोर येते. गडचिरोलीचे पालकमंत्री मुख्यमंत्री आहेत, असा कारभार सुरू असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.

एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहे, कंत्राटदार आत्महत्या करत आहे बिल थकली आहेत. राज्यातील शेतकऱ्यांची बँकाकडे ३५ हजार कोटींची थकबाकी आहे. शेतकरी आता कर्ज घेऊ शकणार नाही, शेतकरी अडचणीत आला आहे पण सरकारला त्याचे देणेघेणे नाही.शक्तिपीठ महामार्गाला शेतकरी विरोध करत आहे, तरी त्या महामार्गासाठी सरकार पैसे द्यायला तयार आहे पण शेतकरी कर्जमाफी मागत आहे त्यासाठी सरकार तयार नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

महायुती सरकारमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. बाहेरून दाखवायला सगळ सुरळीत आहे पण आतून प्रचंड असंतोष आहे. या सरकारमधील दोन पक्षांना सत्तेत टिकून रहायचे म्हणून तोंड दाबून मुका मार सहन करत आहे अशी टीका विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

11 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

11 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

11 तास ago

7 तारखेपर्यंत पगार अनिवार्य; नोकरी सोडल्यानंतर 2 दिवसांत Full & Final, नवीन कामगार नियमांची माहिती

मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा,…

11 तास ago

प्रदीप कबरे यांच्या ‘खिडकी’ अभिवाचनाचा विशेष प्रयोग ३० जुलैला दादरच्या शिवाजी मंदिरात

मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या 'खिडकी' या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित…

11 तास ago

अपघातग्रस्त तरुणीला सुनेत्रा पवार यांची तात्काळ मदत; रुग्णालयात दाखल करून उपचाराची केली व्यवस्था

बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…

11 तास ago