महाराष्ट्र

गृहमंत्री अमित शाहांची संसदेत खोटी माहिती, संसद हल्ला, अक्षरधाम, कंदहार प्रकरणी गप्प का?

हुर्रियत काँन्फरन्सबरोबर सर्वात जास्त चर्चा वाजपेयी सरकारकडून, देशाशी गद्दारी करण्याचे पाप भाजपाचे

मुंबई: ऑपरेशन सिंदूर विषयी संसदेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नेहमीप्रमाणे खोटे बोलले. काँग्रेस सरकार असताना अतिरेकी हल्ले झाले हे सांगताना भाजपा सरकारच्या वेळी झालेल्या हल्ल्यांचा उल्लेख त्यांनी केला नाही. वाजपेयी सरकार असताना संसदेवर हल्ला झाला, अक्षरधाम हल्ला झाला आणि कंदहार विमान अपहरण प्रकरणी तर मंत्री जसवंत सिंह हे सुरक्षेसह पाच कुख्यात अतिरेक्यांना कंदहारला सोडून आले. पाकिस्तानी आयएसआयला पठाणकोटला बोलवण्याचे पापही भाजपा सरकारनेच केले. खरे पाहत देशाशी गद्दारी करण्याचे काम भाजपा सरकारनेच केले आहे असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.

अमित शाह यांच्या निवेदनाचा समाचार घेत अतुल लोंढे म्हणाले की, अमित शाह यांनी काँग्रेस सरकारवर खोटे आरोप केले, काँग्रेस सरकार असताना अतिरेक्यांचे मृतदेह परत दिलेले नाहीत. अफजल गुरु व कसाबला फाशी दिली व जेलमध्येच गाडले. या उलट १९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमन याला २०१५ साली फाशी दिल्यानंतर त्याचा मृतदेह मेमनच्या कुटुंबियांना देण्यात आला याची माहिती अमित शाह यांनी घ्यावी. हुर्रियत काँन्फरन्सबरोबर वाजपेयी सरकारनेच सर्वात जास्त चर्चा केली आहे पण अमित शाह मात्र काँग्रेसवर आरोप करत आहेत. डॉ. मनमोहनसिंह यांचा जन्म पाकिस्तानातील, ते १० वर्षे पंतप्रधान होते पण ते पाकिस्तानला गेले नाहीत पण नरेंद्र मोदी आमंत्रण नसताना पाकिस्तानला जाऊन नवाज शरिफ यांची बिर्याणी खाऊन आले. नरेंद्र मोदींनी शपथविधीलाही नवाज शरिफ यांना आमंत्रण दिले होते, याची आठवण लोंढे यांनी करून दिली.

ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तान फक्त पुढे होता खरा सुत्रधार तर चीन होता, तोच सर्व करत होता असे लष्कराचे उपप्रमुख राहुल के. सिंग यांनी सांगितले आहे. पण अमित शाह यांनी चीनचे नाव घेण्याची हिम्मत दाखवली नाही. संयुक्त राष्ट्राच्या मुद्द्यावर बोलतानाही अमित शाह खोटे बोलले. संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना ही १९४५ साली झाली व अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन व रशिया हे त्याचे सदस्य होते, त्यावेळी भारत स्वतंत्र झालेला नव्हता असेही अतुल लोंढे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जि.प. शाळा सोनेसांगवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत यशाची भरारी…

शिरूर (नितीन थोरात) : सन 2025 -26 या शैक्षणिक वर्षात झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी चमकदार…

47 मिनिटे ago

अमित शाह-शिंदे भेटीत विकासावर भर; शिवसेनेच्या ६ खासदारांच्या मतदारसंघांना केंद्राकडून गतीचे आश्वासन

नवी दिल्ली : 'उबाठा' गटातून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली…

11 तास ago

राज्यातील १९ महाविद्यालयांत १८ महिन्यांत सौरऊर्जा प्रकल्प; चंद्रकांत पाटील यांचे कामांना गतीचे निर्देश

मुंबई: राज्यातील छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नांदेड जिल्ह्यातील १९ महाविद्यालयांमध्ये पुढील १८ महिन्यांत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात…

11 तास ago

अकरावी प्रवेशाची नवी संधी; 16 जुलैपासून पुढील फेरी, सुधारित वेळापत्रक जाहीर

मुंबई: अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील नियमित तीन आणि विशेष दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही प्रवेश…

11 तास ago

लाडकी बहीण’ योजनेत 38% महिलांची फसवणूक; महायुती सरकारवर काँग्रेसचा गंभीर आरोप

62 लाख महिलांना ई-केवायसीच्या कारणावरून लाभापासून वंचित ठेवल्याचा दावा; कॅग अहवालावरूनही सरकारला काँग्रेसचे सवाल नवी…

11 तास ago

शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई! अपघात टाळण्यासाठी  राष्ट्रीय महामार्गावरील २०० अनधिकृत फ्लेक्स हटवले

दुभाजकावरील जाहिरात फलकांमुळे वाहनचालकांची दृश्यमानता बाधित; नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा शिक्रापूर (ओमकार भोरडे): पुणे–अहिल्यानगर राष्ट्रीय…

11 तास ago