ग्राहकांना सतर्क राहण्याचे बँकेचे आवाहन
मुंबई: डिजिटल व्यवहार वाढत असताना सायबर फसवणुकीचे प्रकारही वेगाने वाढत आहेत. सध्या HDFC बँकेच्या नावाने बनावट APK फाइल्स पाठवून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. बँकेने याबाबत ग्राहकांना तातडीचा इशारा दिला आहे.
सायबर गुन्हेगार SMS, WhatsApp किंवा ई-मेलद्वारे लिंक पाठवून ग्राहकांना APK फाइल डाउनलोड करण्यास भाग पाडतात. ही फाइल मोबाईलमध्ये इन्स्टॉल होताच हॅकर्सना फोनवर संपूर्ण नियंत्रण मिळते. परिणामी बँकेकडून येणारे OTP थेट हॅकर्सकडे जातात आणि काही मिनिटांतच खात्यातील संपूर्ण रक्कम गायब होते.
आजचा सर्वात मोठा डिजिटल धोका; APK फ्रॉड
HDFC बँकेच्या माहितीनुसार, हा APK फ्रॉड इतका प्रगत आहे की अनेक सुशिक्षित व अनुभवी ग्राहकही त्याला बळी पडत आहेत. व्यवहार सुरू असतानाच ग्राहकाच्या फोनवर OTP येतो, मात्र तो आधीच हॅकर्सकडे पोहोचलेला असल्याने ग्राहक काहीच करू शकत नाही.
बँकेच्या नावाने येणाऱ्या मेसेजपासून सावध रहा
HDFC बँकेने स्पष्ट केले आहे की,
बँक कधीही OTP, PIN किंवा पासवर्ड फोन, SMS किंवा ई-मेलवर विचारत नाही.
कोणतीही बँकिंग अॅप्स फक्त Google Play Store किंवा Apple App Store वरूनच डाउनलोड करा.
HDFC बँकेचे अधिकृत मेसेज नेहमी HDFCBK किंवा HDFCBN या आयडीवरून येतात आणि त्यातील लिंक hdfcbk.io पासून सुरू होते.
याशिवाय आलेला कोणताही मेसेज संशयास्पद समजावा.
फसवणूक झाल्यास काय कराल
जर चुकून अशा फसवणुकीला बळी पडलात, तर एक मिनिटही वेळ न दवडता
1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर कॉल करा, किंवा
National Cyber Crime Reporting Portal वर तक्रार नोंदवा.
तक्रार जितक्या लवकर, तितकी पैसे परत मिळण्याची शक्यता अधिक असते.
सतर्कता हाच सर्वोत्तम उपाय
आज मोबाईल आपल्या हातात असला, तरी सावधगिरी आपल्या मनात असणे अधिक गरजेचे आहे. एक चुकीचा क्लिक तुमची वर्षानुवर्षांची बचत हिरावून घेऊ शकतो. त्यामुळे कोणतीही संशयास्पद लिंक, कॉल किंवा मेसेज आल्यास तो तात्काळ ब्लॉक करून बँकेला कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…