महाराष्ट्र

मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा

मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली आहेत. त्यामुळे टेरेसवर किंवा पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडू शकत नाही आणि पडलेले सुध्दा नाही. या टाक्यांची स्वच्छता शनिवार दिनांक २५ एप्रिल २०२६ व रविवार दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आली आहेत. त्यामुळे अशा कोणत्याही पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडलेले किंवा मेलेले नाही. सदर व्हायरल झालेला संदेश हा खोटा आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई इलाख्यांच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी पत्राद्वारे कळविले आहे की, मागील चार-पाच दिवसांपासून विविध माध्यम तसेच समाजमाध्यमांवर तसेच मंत्रालयीन अधिकारी-कर्मचारी यांच्या व्हॉटसअॅप ग्रुपवर एक संदेश व्हायरल झाला असून ज्यामध्ये मंत्रालयाच्या टाकीमध्ये मांजर मरुन पडल्याचा खोटा संदेश फिरत असल्याचे निदर्शनास आले असून जो खोटा आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपूर्वीच मंत्रालय मुख्य व विस्तार इमारतीच्या टेरेसवरील पाण्याच्या सिंटेक्सच्या टाक्या चेक केल्या असून, सदरच्या टाक्या ह्या १० फूट ते १२ फूट उंच असून सर्व टाक्यांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियमांनुसार साधारणता १० ते १५ किलो वजनाची लोखंडी झाकणे बसविलेली आहेत, जी पूर्ण वेळ बंद असतात. तसेच मंत्रालयाच्या टेरेसवरील प्रवेश दरवाजा सुध्दा कायम बंद असतो, काही दुरुस्तीची व अत्यावश्यक कामे करावयाची असल्यासच सदर दरवाजा उघडला जातो.

अशा परिस्थितीमध्ये टेरेसवर किंवा पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडूच शकत नाही आणि पडलेले सुध्दा नाही. तसेच मंत्रालयाच्या तळ जमिनीखालील पाण्याच्या टाक्या देखील शनिवार दिनांक २५ एप्रिल २०२६ व रविवार दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी साफ करण्याचे काम हाती घेण्यात आलेले होते व सर्व टाक्या चेक करुन साफ केलेल्या आहेत, त्यामुळे अशा कोणत्याही पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडलेले किंवा मेलेले नाही. सदर वायरल झालेला संदेश हा खोटा आहे, असे त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कुर्ला भूस्खलन दुर्घटना : बाधित कुटुंबांना ४ लाखांची मदत; कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सचिन अहिर आक्रमक

मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेत ६…

5 तास ago

१,२३१ अनुदानित महाविद्यालयांचे कामकाज आता डिजिटल; ‘ई-ऑफिस प्रणाली’चे लोकार्पण

मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि कागदरहित करण्यासाठी सुरू…

5 तास ago

विद्यार्थ्यांच्या सूचनांचे चंद्रकांत पाटलांकडून स्वागत; परीक्षा सुरक्षेसह सामाजिक प्रश्नांवर थेट संवाद

मुंबई : उच्च शिक्षणातील विविध योजना, शिक्षणातील पारदर्शकता, करिअर मार्गदर्शन, परीक्षा सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी…

5 तास ago

महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी; फडणवीसांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

मुंबई: भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.…

5 तास ago

घोडगंगा कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय

शिरूर : शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचालींना…

5 तास ago

रूसा, पीएम उषा प्रकल्पांना गती द्या; विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा वेळेत मिळाव्यात; चंद्रकांत पाटील

मुंबई : विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विकासकामे…

7 तास ago