शिरूर (अरुणकुमार मोटे): राज्य शासनाच्या महत्त्वाच्या महा-ऑनलाईन पोर्टलचा सर्व्हर गेल्या तीन दिवसांपासून पूर्णपणे बंद असल्याने विद्यार्थी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सर्व्हर मेंटेनन्सच्या कामामुळे पोर्टल बंद असल्याची माहिती समोर आली असून, ते नेमके कधी सुरळीत होईल याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून महा-ऑनलाईनसह विविध शासकीय पोर्टल्स ठप्प आहेत. यामुळे उत्पन्न दाखले, रहिवासी दाखले, डोमिसाईल, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रीमी लेयर, प्रतिज्ञापत्र तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे मिळविण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे. अनेक नागरिकांची तातडीची कामे प्रलंबित राहिली असून, विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वच घटक त्रस्त झाले आहेत.
दरम्यान, संबंधित तांत्रिक पथकाकडून समस्या सोडविण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. पोर्टल लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी, ते नेमके कधी पूर्ववत होईल याबाबत निश्चित वेळ देणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी संयम ठेवून सहकार्य करावे, थोड्याच दिवसांत सर्व्हर सुरू होऊन प्रलंबित कामे मार्गी लागतील, असे शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी सांगितले. मात्र, वारंवार होणाऱ्या अशा तांत्रिक अडचणींमुळे शासनाच्या ऑनलाईन सेवांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थी व नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेत ६…
मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि कागदरहित करण्यासाठी सुरू…
मुंबई : उच्च शिक्षणातील विविध योजना, शिक्षणातील पारदर्शकता, करिअर मार्गदर्शन, परीक्षा सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी…
मुंबई: भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.…
शिरूर : शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचालींना…
मुंबई : विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विकासकामे…