महाराष्ट्र

महाराष्ट्राचे पाच तुकडे करण्याचा गद्दारांचा डाव स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके

मुंबई: स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके हे धोरण घेऊन पुढे जाणाऱ्यांना विधानभवनाची पायरी चढू देणार नाही, त्यांनी माझं नाव आदित्य रश्मी उद्धव ठाकरे हे लक्षात ठेवावं, असा गर्भीत इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला. आज जालना जिल्ह्यातील रामनगर येथे आयोजित शिवसंवाद कार्यक्रमात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मिंदे सरकारला चांगलेच फटकारले. गद्दारांनी महाराष्ट्राचे पाच तुकडे करण्याची सुपारी घेतली असल्याचा डाव आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

हिंमत असेल तर राज्यपाल बदलून दाखवावा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी मिंदे सरकारला केले. उद्धव साहेब आणि मी पाठीवर ४० वार घेऊन लढतोय. शिवसेना आज विरोधात आहे, या आधीही विरोधात होती, मात्र ती जनतेच्या प्रश्नांसाठी लढत आहे. शिवसेनेचा जन्मच समाजसेवेसाठी आहे आणि आम्ही सत्तेसाठी नाही तर सत्यमेवसाठी आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.

शिवसेना आणि ठाकरे संपवयाची सुपारी मुख्यमंत्री व गद्दारांनी घेतली, हे त्यांनी त्यांनी जाहीर करावं. मी वरळीतून किंवा ठाणे मतदारसंघातून आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढण्याचे आव्हान केले, मात्र मुख्यमंत्री म्हणतात मी छोटे आव्हान घेत नाही तर अजून मोठे आव्हान येऊ दे. मुख्यमंत्रीजी इतका अहंकार पण बरा नव्हे. आम्ही छोटी माणसं असलो तरी जनतेसाठी जनतेच्या मध्ये राहून काम करतो, असा टोला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री यांना लगावला.

सभा होऊ नये म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रयत्न करतात. याचवेळी मीडियानेच प्रसारित बातमीत वरळी मतदारसंघात कोळी बांधवांसाठी आयोजित कार्यक्रमात इलाहाबादचे कोळीबांधव दिसतात. तर त्या सभेत रिकाम्या खुर्च्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला, अशी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची सभेची खिल्ली उडवली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

10 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

10 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

10 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

10 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

12 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

12 तास ago