महाराष्ट्र

गुन्हेगार सुटू नयेत म्हणून पीडित महिलांच्या एफआरआय लिहिण्यात त्रुटी नसव्यात…

मुंबई: साता-यातील फलटन तालुक्यातील सोनकवडे गावातील कोळसा भट्टीत काम करणाऱ्या  रायगड जिल्ह्यातील आदिवासी महिलेवर सामूहिक बलाकाराची घटना घडली होती. पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी या विषयाची लक्षवेधी शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत मांडली. या अनुशंगाने झालेल्या चर्चेत डॉ मनिषा कायंदे, कपिल पाटील, राम शिंदे यांनी सहभाग घेतला.

गृहमंत्री देवेद्र फडणवीस म्हणाले की, ही घटना गंभीर आहे. या घटनेबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यातील एक आरोपी बाळू शेख यास अटक करण्यात आली आहे. इतर चार अनोळखी आरोपींचा शोध सुरू आहे. ही महिला आपल्या गावी रायगडला परत गेल्यानंतर श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून पुढे येऊन हा गुन्हा दाखल झाला आहे.

तहसीलदार फलटण यांच्याकडून गरीब कातकरी तीन कुटुंबातील ११ व्यक्तींना बंधमुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. या प्रकरणी महिलेच्या वैद्यकीय अहवालात जाणीवपूर्वक दिरंगाई झाली आहे का ते तपासून तसे असल्यास संबंधितांवर कारवाई करू असे त्यांनी सांगितले. अशा प्रकरणी वैद्यकीय चाचणी वेळेत होईल याची दक्षता घेतली जाईल, असेही ते म्हणाले.

या आदिवासी आदिम जमातीला जमीन ,घर,रोजगार, शिक्षण नसल्याने ते सतत स्थलातरित होतात!   या आदिम समाजासाठी जमीन, घर, रोजगार,शिक्षण यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला जाईल.  बेठबिगार म्हणून काम करतात. त्यांची नोंदणी सक्तिची केली जाईल, असे गृहमंत्र्यांनी वि प सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सागितले.

विधान परिषद उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे  यांनी मी या प्रकरणात लक्ष घातले होते, कोळसा भट्टी ची ही पहिलीच घटना नाही, निवासी कामगारांचीही कामगार विभागात नोंद नसते, पोलीस आणि कामगार विभागात समन्वय असेल तर कामगाराची नोंदणी योग्य होईल, या अशा घटना अंधारात घडतात आणि या महिलाना प्रश्न विचारला जातो की दिवा होता का तिरीप होती का गुन्हेगाराला ओळखता का? ती महिला आवाजावरून आरोपीला ओळखू शकते, परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे   एफ आय आर दाखल व्हायला हवी. अधिकारी एफआरआय नोदवतात, पण ते लिहून घेणारी व्यक्ती  नीट लिहित नाही आणि त्यामुळेच अनेकदा पकडलेले गुन्हेगार सुटतात आणि एफ आय आर लिहिण्याची पद्धत बदलली पाहिजे, अशा सूचना डॉ नीलमताई  गोऱ्हे  यांनी केल्या.

गृहमंत्री देवेद्र  फडणवीस यांनी  सांगितले की, अशा प्रकरणी तक्रार नोदवण्यास जाणून-बुजून विलंब  झाल्यास अघिकार्यावर कारवाई होईल ,मात्र असे विषय संवेदनशीलतेचे हाताळले जातील. तसेच एफआरआय लिहिण्याची पद्धती बदलण्यासाठी प्रशिक्षण अकादमीच्या माध्यमातून  त्याना प्रशिक्षण दिले जाईल, अशा आदिम जमातीचे पुनर्वसन होण्यासाठी योग्यप्रकारे  प्रयत्न करू जेणेकरून करून त्यांची भटकती व शोषण थाबेल! असेही आश्वासन फडणवीस यांनी दिले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

19 तास ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

20 तास ago

शिरुर तालुक्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात; निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…

1 दिवस ago

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

2 दिवस ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

2 दिवस ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

2 दिवस ago