मुख्य बातम्या

शिरुर; शेतकऱ्याचे महाडीबीटी योजनेतील 24 हजार अनुदान वर्षभरातही सरकारला देता येईना…

शिरुर (तेजस फडके) सध्या राज्यात लोकसभेची रणधुमाळी चालु असुन मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी किती चांगल्या योजना राबविल्या हे भाजपासहीत महायुतीचे मित्रपक्ष सांगत आहेत. परंतु शिरुर तालुक्यातील गुनाट गावातील भाऊसाहेब मच्छिंद्र भगत यांच्या पेरणी यंत्राचे शासकीय अनुदान 353 दिवस म्हणजे जवळपास 12 महिने उलटुन गेले तरी अद्यापपर्यंत जमा न झाल्याने सरकारकडे शेतकऱ्याला देण्यासाठी 24 हजार रुपये नसावेत हि लाजिरवाणी गोष्ट असल्याचे मत भाऊसाहेब भगत यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत गुनाट (ता. शिरुर) येथील भाऊसाहेब मच्छिंद्र भगत यांनी पेरणी यंत्रासाठी निवड झाली होती. पुर्व संमत्ती दिल्यानंतर यंत्र घेण्यात आले, तपासणीही झाली तसेच अनुदानाची शिफारसही झाली. परंतु 353 दिवस म्हणजे जवळपास 12 महिने उलटुन गेले. तरीही ‘तारीख पे तारीख’ या सरकारी नियमाप्रमाणे अद्यापपर्यंत अनुदान जमा न झाल्याने सरकारकडे 24 हजार रुपये शेतकऱ्यास देण्यासाठी नसावेत हि गंभीर बाब आहे.

 

जेजुरी येथील शासन आपल्या दारी उपक्रमात भाऊसाहेब भगत हे आवर्जुन उपस्थित राहीले. तिथ तरी अनुदानाचे चेक मिळतील अशी अपेक्षाही त्यांना होती. पण तिथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली. त्यामुळे हा शेतकरी मेटाकुटीस आला असुन अनुदानित औजारे घेताना भरमसाठ जीएसटी (GST) भरावी लागतो आणि त्यात वर्षभर जर अनुदान आले नाही तर त्या अनुदानाचा लाभ न मिळाल्यासारखाच आहे असेही भगत म्हणाले.

 

शासनाने चालु केलेली महाडीबीटी योजना शेतकऱ्यांच्या हिताची ठरताना दिसत नाही. कारण ज्यांना जे औजार घ्यायची आहे. त्यांचे नंबर वेळेला लागत नाहीत आणि ज्यांना घ्यायचे नाही अशा शेतकऱ्यांचे नंबर लागतात. औजारांच्या बाबत जो प्रकार घडतोय तोच कांदाचाळ आणि शेततळ्याबाबत घडत आहे. कांदा काढणीच्या अगोदर म्हणजे सर्वसाधारण फेब्रुवारी ते मार्च महिन्यात कांदाचाळी उभारल्या जातात. पण त्यावेळी लकी ड्रॉ होईलच असे नाही आणि झाला तरी नंबर लागेलच असे नाही.

 

तसेच शेततळ्याबाबतही तीच गोष्ट आहे मार्च ते मे दरम्यान पावसाळा नसल्याने शेतकरी शेततळे करण्यासाठी इच्छुक असतात. परंतु त्यावेळी नबंर लागतीलच असे होत नाही. एकंदरीत महाडीबीटी योजना हि फक्त दिखावुपणा आहे असे मत अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत. ज्याला जे लागत ते द्यावं आणि तपासणी करुन घ्यावी हिच जुनी पध्दत चालू व्हावी असे मत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Video; कितीही रडीचे डाव खेळा,येणार तर दणकून येणार, अन जनतेतून येणार; डॉ अमोल कोल्हे

Video; केंद्र सरकारने शेतक-याच्या ताटात माती कालवली; अमोल कोल्हे

Video; ट्रेलर बघताच आढळराव पाटलांची बोलती बंद असं का म्हणाले अमोल कोल्हे…?

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे पाण्यातून विषबाधा ९ शेळ्यांसह ५ मेंढ्यांचा मृत्यू

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली; आम्ही ती वेगाने कनेक्ट केली; एकनाथ शिंदे

रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…

21 तास ago

पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधा-यांचा डाव; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…

21 तास ago

१०७ हुतात्म्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कुठे? कामगार, भाषा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…

23 तास ago

पत्नी खून प्रकरणात दत्तात्रय गायकवाड निर्दोष; परिस्थितीजन्य पुरावे ठरले अपुरे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…

23 तास ago

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

2 दिवस ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

2 दिवस ago