महाराष्ट्र

धर्मांतरावर कडक लगाम! २००४चा मुद्दा पुन्हा तापला

मुंबई: राज्यात आमिष दाखवून किंवा सक्तीने होणाऱ्या धर्मांतराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आज विधानपरिषदेत यासंदर्भातील महत्त्वाचे विधेयक मांडण्यात आले. या चर्चेत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी २००४ साली मांडलेल्या अशासकीय विधेयकाचा संदर्भ विशेष ठरला. तसेच तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या भूमिकेचीही आठवण करून देण्यात आली.

२००४ च्या हिवाळी अधिवेशनात डॉ. गोऱ्हे यांनी मेळघाटातील आदिवासींच्या धर्मांतराचा प्रश्न आक्रमकपणे उपस्थित केला होता. गरीब आणि अशिक्षित नागरिकांना औषधे, शिक्षण व रोजगाराचे आमिष दाखवून धर्मांतर घडवून आणले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. चिखलदरा तालुक्यातील काही गावांमध्ये सहलीच्या नावाखाली सामूहिक धर्मांतर झाल्याचे पुरावेही त्यांनी सभागृहात मांडले होते.

त्या वेळी उत्तर देताना आर. आर. पाटील यांनी अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाला कडक निर्देश दिले होते. धर्मांतरासाठी प्रवृत्त करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. सक्तीने धर्मांतर होत असल्यास विद्यमान कायद्यांनुसार कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान, आज मांडण्यात आलेल्या नव्या विधेयकातही याच पार्श्वभूमीची झलक दिसून येते. धर्मांतरासाठी फसवणूक, सक्ती किंवा आर्थिक आमिष देणे हा दखलपात्र गुन्हा ठरणार असून दोषींना १० वर्षांपर्यंत कारावास व दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पीडितांच्या तक्रारींवर तत्काळ कारवाईसाठी विशेष यंत्रणा उभारण्याचाही प्रस्ताव आहे.“२००४ पासून आजपर्यंत परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे केवळ चर्चा नको, तर ठोस आणि वस्तुनिष्ठ कायद्याची गरज आहे,” असे मत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात नीलम गोऱ्हे यांची तातडीची भेट; न्यायासाठी ठाम भूमिका

पालघर: पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन आदिवासी मुलीवर भोंदू बाबाकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या…

7 तास ago

अजितदादांच्या कार्याला सलाम! आर्यनसिंह दडियालाचा २१० किमी पोहण्याचा ऐतिहासिक विक्रम

मुंबई: ‘कामाचा माणूस’ म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या कार्याला…

7 तास ago

इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रमाला मंजुरी; येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडवित, इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी देण्यात…

11 तास ago

‘हरलो नाही, राजीनामा नाही’ ममता बॅनर्जी ठाम; कालीघाटातून संघर्षाची घोषणा

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठे वळण आले असून Mamata Banerjee यांनी पराभव मान्य…

11 तास ago

एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणर; प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने सवलतधारक प्रवाशांना NCMC (National Common Mobility Card)…

12 तास ago

Video! रांजणगाव MIDC दहशतीत! कामगारांवर हल्ले आणि लूटमारीचे वाढले प्रमाण…

रांजणगाव (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहत (MIDC) परिसरात परप्रांतीय कामगारांवर हल्ले, लूटमार…

13 तास ago