मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज टिळक भवन येथे विविध पक्ष व संघटनांतील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी तसेच संभाजी ब्रिगेड यांसह विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांचा यात समावेश होता.
प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास वाढत असल्याचे सांगत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सचिन सावंत, अनंत गाडगीळ, सिद्धार्थ हत्तिअंबिरे, धनंजय शिंदे, प्रा. प्रकाश सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते.
सपकाळ म्हणाले की, काँग्रेसचा सर्वसमावेशक विचार आणि राहुल गांधी यांचे नेतृत्व यावर लोकांचा विश्वास वाढत आहे. देशातील धर्मांध शक्तींना तोंड देण्यासाठी काँग्रेसच सक्षम असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी सचिन सावंत यांनी केंद्र सरकारवर टीका करत सामाजिक सलोखा बिघडवला जात असल्याचा आरोप केला. आर्थिक विषमता वाढत असून शेतकरी, शेतमजूर आणि वंचित घटकांकडे दुर्लक्ष होत असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस पक्ष जनतेच्या भावनांशी एकरूप असून पुढील पिढीसाठी संघर्ष करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…
शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…
शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…