व्यापार हत्यार बनलं असून हा हिंदुस्थानसाठी वेकअप कॉल

मुंबई: अमेरिकेने लादलेल्या 50 टक्के टॅरिफची अंमलबजावणी सुरू झाली असून यामुळे हिंदुस्थानवर मोठा आर्थिक बोझा पडणार आहे. याचा विविध क्षेत्रांवर परिणाम होणार आहे. याबाबत आता ‘रिझर्व्ह बॅक ऑफ इंडिया’चे माजी गव्हर्नर आणि प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. रघुराम राजन यांनी मोठे विधान केले आहे.

जागतिक पातळीवर व्यापाराला हत्यार बनवले जात असून हिंदुस्थानसाठी हा वेकअप कॉल असल्याचे रघुराम राजन म्हणाले. हिंदुस्थानने एका व्यापारिक भागीदारावरील अवलंबवित्व कमी केले नाही तर अशा अडचणी येतच राहतील, असा इशाराही त्यांनी दिला.

रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने हिंदुस्थानवर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला आहे. यामुळे हिंदुस्थानातून निर्यात होणाऱ्या वस्तुंवर 50 टक्के टॅरिफ लागू झाला असून याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. याबाबत बोलताना रघुराम राजन म्हणाले की, जागतिक पातळीवर व्यापार, गुंतवणूक आणि वित्त याचा हत्यार म्हणून वापर होऊ लागला आहे. त्यामुळे हिंदुस्थानने काळजीपूर्वक पावले उचलायला हवीत. हा वेकअप कॉल असून आपण एका देशावर अवलंबून राहू नये. पूर्वेकडील देश, युरोप आणि आफ्रिकेकडे मोर्चा वळवावा. योग्य उपाययोजना केल्यामुळे आपल्याला 8 ते 8.5 टक्के विकासदर साधून रोजगार निर्मिती करता येईल.

ते पुढे म्हणाले की, अमेरिकेसोबत व्यापार सुरू ठेवणे आवश्यक असून रशियाकडून तेल खरेदीच्या निर्णयाचेही पुनर्मूल्यांकन करावे लागेल. आपल्याला हा विचार करावा लागेल की, यामुळे फायदा होतोय की नुकसान. एका बाजुला रशियाकडून घेतलेले तेल रिफाईन करून नफा कमवत आहोत, तर दुसर्‍या बाजुला निर्यातदार टॅरिफच्या माध्यमातून जास्त शुल्क भरत आहेत. त्यामुळे याचा विचार करणे योग्य ठरेल.

आपण एकावर अवलंबून न राहता पर्याय शोधावे. या संकटाला संधी म्हणून पहावे. चीन, जपान, अमेरिका किंव इतर कुठल्याही देशासोबत काम करा, पण त्यांच्यावर अवलंबून राहू नका. पर्याय शोधा, शक्य तितके आत्मनिर्भरतेवर भर द्या, असे राजन म्हणाले. अमेरिकेच्या टॅरिफमुळे माशांची शेती करणारे शेतकरी, कापड उत्पादक, लहान निर्यातदार यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा लोकांची उपजीविका धोक्यात येईल. अर्थात यामुळे अमेरिकन ग्राहकांनाही खिसा मोकळा करावा लागेल. कारण 50 टक्के टॅरिफमुळे त्यांना जास्त पैसे मोजून वस्तू खरेदी कराव्या लागतील, असेही ते म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आचारसंहितेदरम्यान घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाने चौकशी करावी; अनंत गाडगीळ

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…

2 दिवस ago

शेतकरी कर्जमाफी फसवी; सर्वपक्षीय बैठक बोलवा; विजय वडेट्टीवार

नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…

2 दिवस ago

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर समर्थ पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व; सर्व १४ जागांवर विजय

मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…

2 दिवस ago

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त राज्यभर जनजागृती व नेत्र चिकित्सा शिबिरे; चंद्रकांत पाटील

मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…

2 दिवस ago

एनडीए बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन ११ जूनला

षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…

2 दिवस ago

भारतातील आर्थिक-राजकीय संकटे! वास्तव आणि परिणाम विषयावर काँग्रेसचे चर्चासत्र १३ जूनला

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त…

2 दिवस ago