मुंबई: राज्यातील आदिवासीबहुल भागातील विद्यापीठांमध्ये आदिवासी अध्ययन, संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आदिवासी अध्यासन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे आदिवासी अध्ययन व संशोधनाला गती मिळणार असून आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध होतील, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली.
मंत्रालयात मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी अध्यासन केंद्रांना निधी उपलब्ध करून देण्याबाबत बैठक पार पडली. या बैठकीला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, आदिवासी विकास विभागाचे सहसचिव मच्छिंद्र शेळके तसेच मुंबई, जळगाव, नांदेड, अमरावती आणि गडचिरोली येथील विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.
मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले की, जळगाव, नांदेड आणि मुंबई विद्यापीठात सध्या आदिवासी अध्यासन केंद्र कार्यरत आहेत. आता अमरावती आणि गडचिरोली विद्यापीठात नव्याने ही केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. या केंद्रांसाठी आदिवासी विकास विभागाकडून प्रत्येकी ३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यातून संशोधन उपक्रम, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत.
या केंद्रांच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकासासाठी संशोधनाधारित उपक्रम राबवले जाणार आहेत. महाराष्ट्रातील आदिवासी जमातींची लोकसंस्कृती, भाषा, परंपरा आणि इतिहास जतन करून तो पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कामही या केंद्रांतून केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी सांगितले की, या अध्यासन केंद्रांमुळे आदिवासी समाजाच्या पारंपरिक ज्ञान, संस्कृती आणि जीवनशैलीचा अभ्यास व संवर्धन होईल. तसेच शिक्षण आणि संशोधनाच्या माध्यमातून आदिवासी युवकांना नवीन संधी उपलब्ध होऊन त्यांचा सर्वांगीण विकास साध्य होण्यास मदत होईल. आदिवासी विद्यार्थ्यांचा उच्च व तंत्र शिक्षणातील सहभाग वाढवून त्यांना रोजगारक्षम बनविणे हेही या केंद्रांचे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.
मुंबई: नीट (NEET) पेपर लिक प्रकरणी राष्ट्रीय चाचणी संस्थेचे (NTA) महासंचालक अभिषेक सिंह यांची तात्काळ…
गुवाहाटी: आसामचे मुख्यमंत्री Himanta Biswa Sarma यांच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त गुवाहाटी दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या…
शिरुर (तेजस फडके) देशात महिलांना राजकीय सक्षमीकरण मिळावे, निर्णय प्रक्रियेत त्यांचा थेट सहभाग वाढावा आणि…
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिक्रापुर परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ होत असून, पाबळ फाटा येथील सिद्धी…
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) सणसवाडी (ता. शिरुर) परिसरात किरकोळ वादातून दोन जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्याच्या पुर्व भागातील एका गावात घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली…