वेरूळ : बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी निघालेल्या कर्नाटकातील एका भाविक महिलेचा घृष्णेश्वर मंदिर परिसरात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेमुळे यात्रेतील भाविकांमध्ये शोककळा पसरली आहे.
मोरम्मा मलकाजप्पा पट्टन शेट्टी (वय ५८) असे मृत महिलेचे नाव असून त्या कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्हा येथील रहिवासी होत्या. त्या आपल्या कुटुंबीयांसह आणि २७ जणांच्या समूहासोबत ११ फेब्रुवारी रोजी इंडी तालुक्यातून ज्योतिर्लिंग यात्रेसाठी रवाना झाल्या होत्या.
यात्रेदरम्यान त्यांनी औंढा नागनाथ मंदिर, परळी वैजनाथ मंदिर, काशी विश्वेश्वर मंदिर, महाकालेश्वर मंदिर, ओंकारेश्वर मंदिर आणि घृष्णेश्वर अशा सहा ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण केले होते. उर्वरित सहा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी त्या पुढे जाणार होत्या.
दरम्यान, शनिवारी रात्री घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन त्या मंदिर परिसरातील पार्किंगकडे परतत असताना त्यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या आणि त्या जागीच कोसळल्या. सोबत असलेल्या भाविकांनी त्यांना तातडीने खुलताबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. रविवारी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.
मृत महिलेचा मुलगा भारतीय सैन्यात कर्नल पदावर श्रीनगर येथे कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. यात्रेतील सर्व भाविक कर्नाटकचे असल्याने भाषेची अडचण निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब फुलारे यांनी पुढाकार घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत केली.
या घटनेनंतर उर्वरित २६ भाविकांनी आपली यात्रा अर्धवट सोडून कर्नाटकला परतण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद खुलताबाद पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची देशभर चर्चा रंगली…
नेस्कोतील कार्यक्रमात २० हजार नागरिकांना शासकीय लाभांचे वितरण; दापोलीतील मीनाताई ठाकरे नाट्यगृहासाठी १५ कोटींची घोषणा…
रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): भांबर्डे (ता. शिरुर) गावातील मंदिर परिसरातील तळ्याच्या भरावावर तसेच जुन्या दहिवडी…
मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय 'कमळी' मालिकेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असून,…
मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मक्यात पोषकतत्वांचा खजिना असल्याने याचे अनेक फायदे शरीरास होतात.…
निविदा प्रक्रियेमुळे अवैध राख माफियांना लगाम; तीन वर्षांतील सर्वाधिक महसूल महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या तिजोरीत…