महाराष्ट्र

महाविकास आघाडीत राज्यसभा जागेवरून रस्सीखेच; ठाकरेंकडून महिला नेत्याला संधीचे संकेत

मुंबई: मार्च महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत (MVA) एकाच जागेवरून चुरस निर्माण झाली आहे. या जागेवर आपला दावा असल्याचे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. पक्षाकडे सर्वाधिक 20 आमदार असल्याचा दावा करत ही जागा शिवसेनेकडेच यावी, अशी भूमिका मांडली जात आहे.

दुसरीकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देखील या जागेसाठी आग्रही असून दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांना दुय्यम स्थान देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

महिला नेत्याला संधी?

ही जागा शिवसेनेकडे आली तर महिला नेत्याला उमेदवारी देण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. आदित्य ठाकरे यांनी संसदेत संजय राऊत आणि प्रियांका चतुर्वेदी यांनी केलेल्या कामगिरीचा उल्लेख करत या दोन्ही जागा पुन्हा शिवसेनेकडेच राहाव्यात, असे स्पष्ट मत व्यक्त केले.

राज्यसभेतील प्रियांका चतुर्वेदी यांचा कार्यकाळ संपला असून त्यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जुन्या फळीमध्ये नाराजीची शक्यता

याआधी या जागेसाठी चंद्रकांत खैरे, विनायक राऊत, राजन विचारे आणि सुभाष देसाई यांच्या नावांची चर्चा होती. मात्र महिला उमेदवारीचे संकेत मिळाल्याने या ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

काँग्रेसचा पर्याय काय?

दरम्यान, विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांना विधान परिषदेची जागा देऊन राज्यसभेची जागा काँग्रेसला सोडावी, असा प्रस्ताव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे मांडणार असल्याची माहिती आहे. सपकाळ यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना याबाबत संकेत दिले.

अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

महाविकास आघाडीत ही जागा नेमकी कोणाला मिळणार, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, जागावाटपावरून आघाडीत अंतर्गत चर्चा आणि राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी काही दिवसांत या विषयावर स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

18 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

18 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

18 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

20 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

1 दिवस ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

1 दिवस ago