मुंबई: मार्च महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत (MVA) एकाच जागेवरून चुरस निर्माण झाली आहे. या जागेवर आपला दावा असल्याचे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. पक्षाकडे सर्वाधिक 20 आमदार असल्याचा दावा करत ही जागा शिवसेनेकडेच यावी, अशी भूमिका मांडली जात आहे.
दुसरीकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देखील या जागेसाठी आग्रही असून दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांना दुय्यम स्थान देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महिला नेत्याला संधी?
ही जागा शिवसेनेकडे आली तर महिला नेत्याला उमेदवारी देण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. आदित्य ठाकरे यांनी संसदेत संजय राऊत आणि प्रियांका चतुर्वेदी यांनी केलेल्या कामगिरीचा उल्लेख करत या दोन्ही जागा पुन्हा शिवसेनेकडेच राहाव्यात, असे स्पष्ट मत व्यक्त केले.
राज्यसभेतील प्रियांका चतुर्वेदी यांचा कार्यकाळ संपला असून त्यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जुन्या फळीमध्ये नाराजीची शक्यता
याआधी या जागेसाठी चंद्रकांत खैरे, विनायक राऊत, राजन विचारे आणि सुभाष देसाई यांच्या नावांची चर्चा होती. मात्र महिला उमेदवारीचे संकेत मिळाल्याने या ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
काँग्रेसचा पर्याय काय?
दरम्यान, विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांना विधान परिषदेची जागा देऊन राज्यसभेची जागा काँग्रेसला सोडावी, असा प्रस्ताव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे मांडणार असल्याची माहिती आहे. सपकाळ यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना याबाबत संकेत दिले.
अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
महाविकास आघाडीत ही जागा नेमकी कोणाला मिळणार, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, जागावाटपावरून आघाडीत अंतर्गत चर्चा आणि राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी काही दिवसांत या विषयावर स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची देशभर चर्चा रंगली…
नेस्कोतील कार्यक्रमात २० हजार नागरिकांना शासकीय लाभांचे वितरण; दापोलीतील मीनाताई ठाकरे नाट्यगृहासाठी १५ कोटींची घोषणा…
रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): भांबर्डे (ता. शिरुर) गावातील मंदिर परिसरातील तळ्याच्या भरावावर तसेच जुन्या दहिवडी…
मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय 'कमळी' मालिकेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असून,…
मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मक्यात पोषकतत्वांचा खजिना असल्याने याचे अनेक फायदे शरीरास होतात.…
निविदा प्रक्रियेमुळे अवैध राख माफियांना लगाम; तीन वर्षांतील सर्वाधिक महसूल महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या तिजोरीत…