मुंबई: मार्च महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत (MVA) एकाच जागेवरून चुरस निर्माण झाली आहे. या जागेवर आपला दावा असल्याचे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. पक्षाकडे सर्वाधिक 20 आमदार असल्याचा दावा करत ही जागा शिवसेनेकडेच यावी, अशी भूमिका मांडली जात आहे.
दुसरीकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देखील या जागेसाठी आग्रही असून दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांना दुय्यम स्थान देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महिला नेत्याला संधी?
ही जागा शिवसेनेकडे आली तर महिला नेत्याला उमेदवारी देण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. आदित्य ठाकरे यांनी संसदेत संजय राऊत आणि प्रियांका चतुर्वेदी यांनी केलेल्या कामगिरीचा उल्लेख करत या दोन्ही जागा पुन्हा शिवसेनेकडेच राहाव्यात, असे स्पष्ट मत व्यक्त केले.
राज्यसभेतील प्रियांका चतुर्वेदी यांचा कार्यकाळ संपला असून त्यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जुन्या फळीमध्ये नाराजीची शक्यता
याआधी या जागेसाठी चंद्रकांत खैरे, विनायक राऊत, राजन विचारे आणि सुभाष देसाई यांच्या नावांची चर्चा होती. मात्र महिला उमेदवारीचे संकेत मिळाल्याने या ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
काँग्रेसचा पर्याय काय?
दरम्यान, विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांना विधान परिषदेची जागा देऊन राज्यसभेची जागा काँग्रेसला सोडावी, असा प्रस्ताव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे मांडणार असल्याची माहिती आहे. सपकाळ यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना याबाबत संकेत दिले.
अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
महाविकास आघाडीत ही जागा नेमकी कोणाला मिळणार, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, जागावाटपावरून आघाडीत अंतर्गत चर्चा आणि राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी काही दिवसांत या विषयावर स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे.
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील एका अल्पवयीन मुलाने जुन्या वादाचा राग मनात धरून, गेल्या…
शिरूर (तेजस फडके) : नवीन खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या वादातुन एकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका चुलत…
शिक्रापुर (ओंकार भोरडे) शिरुर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा उलगडा अवघ्या 36…
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…
नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…
मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…