महाराष्ट्र

वाहनधारकांनो सावधान! वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना अर्ध्या किमी. दुरून सुद्धा पकडणार; RTO ची नवीन यंत्रणा सज्ज

संभाजीनगर: आरटीओ कार्यालयांची इंटरसेप्टर वाहने अधिक सक्षम होणार आहेत कारण त्यांच्यावर रडार प्रणाली बसवली जात आहे.

रडार प्रणाली म्हणजे काय

रडार म्हणजे अशी प्रणाली जी वाहनाचा वेग, हालचाल आणि नियमभंग दूरूनच ओळखते. यात हाय-टेक कॅमेरे सेन्सर्स आणि सॉफ्टवेअर वापरले जातात. त्यामुळे वाहन थांबवण्याची आवश्यकता नसते.

रडार प्रणाली कशी काम करेल

1) रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाचा फोटो काढला जाईल.

2) वाहनाचा वेग मोजला जाईल

3) चालकाने सीट बेल्ट लावला आहे का हेल्मेट घातले आहे काहे तपासले जाईल.

4) वाहन धोकादायक पद्धतीने चालवले जात आहे का, याची पडताळणी होईल.

5) हे सर्व डेटा रडार प्रणालीकडून काही सेकंदांत प्रोसेस होऊन, ई-चालान वाहनधारकाला पाठवले जाईल.

५०० मीटर अंतरापर्यंत नियंत्रण

रडार प्रणाली ५०० मीटर अंतरापर्यंतच्या वाहनाची नोंद घेऊ शकते.

म्हणजेच वाहन किती दूरवरून येत आहे, त्याचा वेग किती आहे, नियमभंग झाला आहे का, हे लगेच टिपले जाईल.

जुन्या पद्धतीत व नवीन रडार प्रणालीतील फरक

सध्या स्पीड गनने तासाला फक्त १५ ते २० चालान तयार होतात.

पण रडार प्रणालीमुळे तासाला तब्बल ७०० ते ८०० चालान करता येणार आहेत.

दिवसासोबतच रात्रीसुद्धा स्पष्ट फोटो मिळणार.

कुठे बसवली जाणार

मुंबई आणि पुण्यानंतर आता *छत्रपती संभाजीनगर* मध्येही काम सुरू झाले आहे.

मराठवाड्यातील एकूण १७ आरटीओ वाहनांवर हे उपकरण बसवले जाणार आहे.

एका वाहनाला बसवण्यासाठी फक्त ६ तास लागतात.

वाहनधारकांनो लक्षात ठेवा.

वाहतूक नियम तोडल्यास सुटणे आता अशक्त बेल्ट आणि हेल्मेट बंधनकारक!

वेगमर्यादा ओलांडली तर लगेच ई-चालान!

धोकादायक ड्रायव्हिंगवर लगेच कारवाई!

एकंदरीत म्हणजे काय तर* छ. संभाजीनगरसह संपूर्ण राज्यभर राबवली जाणारी ही रडार प्रणाली वाहतूक शिस्त राखण्यासाठी आणि अपघात कमी करण्यासाठी मोठी क्रांती ठरणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

9 तास ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

9 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

9 तास ago

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

10 तास ago

मोदींनी सोनम वांगचुकांची भेट का घेतली नाही?; राम मंदिर चोरीवर भाजप-आरएसएसवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…

10 तास ago

मोदींकडून बारामतीच्या नव्या रेल्वे स्थानकाचे लोकार्पण; पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मिळाली नवी गती

बारामती : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील बारामती व नांदुरा या दोन…

10 तास ago