महाराष्ट्र

वाहनधारकांनो सावधान! वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना अर्ध्या किमी. दुरून सुद्धा पकडणार; RTO ची नवीन यंत्रणा सज्ज

संभाजीनगर: आरटीओ कार्यालयांची इंटरसेप्टर वाहने अधिक सक्षम होणार आहेत कारण त्यांच्यावर रडार प्रणाली बसवली जात आहे.

रडार प्रणाली म्हणजे काय

रडार म्हणजे अशी प्रणाली जी वाहनाचा वेग, हालचाल आणि नियमभंग दूरूनच ओळखते. यात हाय-टेक कॅमेरे सेन्सर्स आणि सॉफ्टवेअर वापरले जातात. त्यामुळे वाहन थांबवण्याची आवश्यकता नसते.

रडार प्रणाली कशी काम करेल

1) रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाचा फोटो काढला जाईल.

2) वाहनाचा वेग मोजला जाईल

3) चालकाने सीट बेल्ट लावला आहे का हेल्मेट घातले आहे काहे तपासले जाईल.

4) वाहन धोकादायक पद्धतीने चालवले जात आहे का, याची पडताळणी होईल.

5) हे सर्व डेटा रडार प्रणालीकडून काही सेकंदांत प्रोसेस होऊन, ई-चालान वाहनधारकाला पाठवले जाईल.

५०० मीटर अंतरापर्यंत नियंत्रण

रडार प्रणाली ५०० मीटर अंतरापर्यंतच्या वाहनाची नोंद घेऊ शकते.

म्हणजेच वाहन किती दूरवरून येत आहे, त्याचा वेग किती आहे, नियमभंग झाला आहे का, हे लगेच टिपले जाईल.

जुन्या पद्धतीत व नवीन रडार प्रणालीतील फरक

सध्या स्पीड गनने तासाला फक्त १५ ते २० चालान तयार होतात.

पण रडार प्रणालीमुळे तासाला तब्बल ७०० ते ८०० चालान करता येणार आहेत.

दिवसासोबतच रात्रीसुद्धा स्पष्ट फोटो मिळणार.

कुठे बसवली जाणार

मुंबई आणि पुण्यानंतर आता *छत्रपती संभाजीनगर* मध्येही काम सुरू झाले आहे.

मराठवाड्यातील एकूण १७ आरटीओ वाहनांवर हे उपकरण बसवले जाणार आहे.

एका वाहनाला बसवण्यासाठी फक्त ६ तास लागतात.

वाहनधारकांनो लक्षात ठेवा.

वाहतूक नियम तोडल्यास सुटणे आता अशक्त बेल्ट आणि हेल्मेट बंधनकारक!

वेगमर्यादा ओलांडली तर लगेच ई-चालान!

धोकादायक ड्रायव्हिंगवर लगेच कारवाई!

एकंदरीत म्हणजे काय तर* छ. संभाजीनगरसह संपूर्ण राज्यभर राबवली जाणारी ही रडार प्रणाली वाहतूक शिस्त राखण्यासाठी आणि अपघात कमी करण्यासाठी मोठी क्रांती ठरणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

10 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

16 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

16 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

16 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

16 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

2 दिवस ago