न्हावरे (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील करडे गावात पैशांच्या वादातून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकावर दगडफेक करुन गंभीर दुखापत करण्यात आली. या हल्ल्यात पीडिताच्या गळ्यातील सोन्याची चैन तुटून हरवल्याची धक्कादायक घटना असुन याबाबत संदेश लहु शेलार (वय ४०, रा. करंजावणे, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदेश शेलार यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असुन करडे येथील आर.एम.सी. प्लॅन्टचे भागीदार पवन दिलीप घुले यांच्याकडे त्यांचा पैशाचा व्यवहार बाकी होता. त्यामुळे शेलार यांनी घुले यांना पैसे मागण्यासाठी फोन केला असता, “तुला पैसे अर्जुन काळेकडून घ्यायचे आहेत, प्लॅन्टवर आलास तर जीव मारुन टाकीन,” अशी धमकी शेलार यांना घुलेने दिली.
यानंतर अर्जुन काळे यांनी शेलार यांना प्लॅन्टवर बोलावले. शेलार हे त्यांचे मित्र स्वप्नील शिंदे व निलेश फुंडेसोबत स्वतःच्या गाडीने (एम एच १२ यु एफ ९६१३) आर.एम.सी. प्लॅन्टजवळ गेले. त्या वेळी अनोळखी चार इसमांनी अचानक शेलार यांच्या गाडीवर दगडफेक करुन गाडीच्या काचा फोडल्या.
दरम्यान, आरोपी पवन घुले याने गाडीच्या डाव्या बाजूच्या काचेवर दगड फेकला. तो दगड थेट शेलार यांच्या डोळ्याजवळ आदळून ते गंभीर जखमी झाले. त्याचवेळी शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी देत मारहाण करण्यात आली. यात शेलार यांचा शर्ट फाटला आणि गळ्यातील चार तोळ्यांचे सोन्याची चैन तुटून हरवली.
या प्रकरणी पवन दिलीप घुले (रा. करडे, ता. शिरुर, जि. पुणे) तसेच अन्य चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध शिरुर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर ह करत आहेत.
नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…
दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील…
चंदगड: नागरदळे (ता. चंदगड) येथे मीरा-भाईंदर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलिस शिपाई दयानंद कृष्णा पाटील (वय…
मुंबई: महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA) यांच्या वतीने राज्यातील एकल पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना सहाय्य,…
राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, मावा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम…
मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे…