मुंबई: मुंबईच्या ओळखी, इतिहास आणि मराठी माणसाच्या हक्काच्या प्रश्नावर भाष्य करणारा एक विचारप्रवर्तक संदेश सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या संदेशात मुंबईच्या बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक स्वरूपावर प्रकाश टाकत राजकीय वादांपेक्षा एकी आणि माणुसकी जपण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई ही कोळी, आगरी, भंडारी यांसारख्या स्थानिक समाजांची भूमी असून काळाच्या ओघात ती देशभरातील लोकांना सामावून घेणारे महानगर बनले आहे. उद्योग, व्यापार आणि रोजगाराच्या संधींमुळे विविध प्रांतांतील लोक येथे स्थायिक झाले असून शहराच्या आर्थिक प्रगतीत सर्वांचाच वाटा असल्याचे या संदेशात नमूद करण्यात आले आहे.
तसेच निवडणुकीच्या काळात मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे करून राजकीय पक्ष मतांची समीकरणे साधतात, मात्र प्रत्यक्षात मुंबईतील स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याची टीकाही यात करण्यात आली आहे. कोळीवाडे, गावठाणे, चाळसंस्कृती, नाट्यगृहे आणि सांस्कृतिक केंद्रांवर झालेल्या अतिक्रमणाचा उल्लेख करत शहराच्या बदलत्या स्वरूपाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
याचबरोबर संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देत १०५ हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे भावनिकदृष्ट्या मुंबईवर मराठी माणसाचा हक्क असल्याची भावना प्रबळ असल्याचेही नमूद केले आहे.
दरम्यान, भारतीय राज्यघटनेनुसार देशातील कोणत्याही नागरिकाला कुठेही राहण्याचा आणि व्यवसाय करण्याचा अधिकार असल्याने मुंबई ही सर्वांना सामावून घेणारी आर्थिक राजधानी बनल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्याच्या अस्थिर परिस्थितीत वाद, अफवा आणि प्रांतीयतेपासून दूर राहून एकी, माणुसकी आणि परस्पर आदर जपण्याची गरज असल्याचे या संदेशातून अधोरेखित करण्यात आले आहे. मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी समाजाने एकत्र येण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
शिरुर (तेजस फडके) एका वृद्ध व्यक्तीची हरवलेली बॅग तत्परतेने शोधून अवघ्या एका तासात संबंधित व्यक्तीच्या…
पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच…
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…
शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…
आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…
जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…