आरोग्य

अपचन-आंबट ढेकर, गॅसेसचा त्रास

सध्याच्या खाण्या पिण्याच्या सवयी पूर्णपणे बदलत चालल्या आहे. वेळेचा अभाव, योग्य आहार न खाणे, प्रत्येक वेळेस उलट सुलट खाणे, तळकट मसालेदार पदार्था मुळे पचनक्रिया तर बिघडतेच, शिवाय वजन यासह इतर गंभीर आजार निर्माण होतात, ज्यामुळे आरोग्य बिघडते. मुख्य म्हणजे बद्धकोष्ठता, गॅस, ॲसिडिटी, पोट फुगणे या त्रासामुळे दिवसभर कामात लक्ष लागत नाही, व खाल्लेलं अन्नही लवकर पचत नाही. पोटाचे विकार छळू नये, यासाठी खाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या, खाता पिताना कोणती काळजी घायायला हवी, जेणेकरून पोटाचा त्रास होणार नाही. अपचन होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी.

पाणी पिणे: जेवण करण्याच्या ३० मिनिट आधी नेहमी पाणी प्यावे. उत्तम आरोग्यासाठी शरीर नेहमी हायड्रेट ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कारण अशा स्थितीत पचनासह शरीराची सर्व कार्ये व्यवस्थित चालतात. दिवसभरात किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. शिवाय असे पदार्थ खावे, ज्यात पाण्याचे प्रमाण जास्त असेल.

आल: आहारात आल्याचा समावेश केल्याने अपचन आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. पदार्थात आल्याचा समावेश केल्याने पचनक्रिया मजबूत होते आणि शरीरातील आजार दूर होतात. आपण कच्चे आले चघळू शकता किंवा आल्याचा चहा, आले पाणी, आले कँडी खाऊ शकता.

दही: दही कोणत्याही ऋतूत खाऊ शकता. दही हे एक प्रोबायोटिक फूड आहे. दह्यात चांगले बॅक्टेरिया मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे पचनक्रियेत कोणतीही अडचण येत नाही. आहारात दह्याचा समावेश केल्याने पोट थंड राहते, शिवाय अन्नही लवकर पचते. दही जेवण करताना किंवा जेवणा नंतरही खाऊ शकता.

शतपावली: जेवल्या नंतर काहींना लगेच झोपण्याची सवय असते, पण ही सवय वेळीच टाळा. जेवल्या नंतर शतपावली करा. निदान १० ते १५ मिनिटं शतपावली करणं गरजेचं आहे. यामुळे अन्न पचण्यास मदत होते आणि नंतर बद्धकोष्ठता किंवा गॅसेस सारखा त्रास होत नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महिला आरक्षणावर भाजपाला अधिकार नाही; RSS मध्ये महिला सरसंघचालक नेमून दाखवा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…

9 तास ago

पहलगाम हल्ल्याच्या सूत्रधाराला फाशी कधी? राष्ट्रवादी काँग्रेस चा मोदी सरकारवर हल्लाबोल

महेश तपासे यांचा सवाल; परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि महिला आरक्षणावरही केंद्रावर टीका मुंबई: पाहलगाम…

9 तास ago

के.ई.एम. रुग्णालय नामांतरावरून वाद; ‘फलक नव्हे, सुविधा वाढवा’ – अमोल मातेले

मुंबई : KEM Hospital (के.ई.एम. रुग्णालय) चे नाव बदलण्याच्या मागणीवरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वाद…

10 तास ago

घराणेशाहीमुळे महिला आरक्षणाला विरोध; नीलम गोऱ्हे यांचा आरोप

मुंबई: महिला आरक्षण विधेयकाविरोधात भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस खासदार…

10 तास ago

काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसवर घणाघात

मुंबई: काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही आणि देशद्रोही असल्याचा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत…

10 तास ago

पीसीएम-पीसीबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; दुसऱ्या प्रयत्नासाठी नोंदणीसाठी २३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मुंबई: पीसीएम आणि पीसीबी गटातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेत दुसऱ्या प्रयत्नासाठी (Second Attempt) नोंदणी…

10 तास ago