महाराष्ट्र

पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत?

मुंबई: अजित पवारांच्या अकाली निधनानंतर होणाऱ्या पहिल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर राज्याचे लक्ष लागले आहे. पुणे जिल्हा परिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून, निकाल सोमवारी (9 जून) जाहीर होणार आहेत.

मात्र निकालाच्या आधीच पॉलिटिकल रिसर्च अँड अॅनालिसिस ब्युरो (PRAB) चा एक्झिट पोल समोर आला आहे. या पोलच्या अंदाजानुसार, पुणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे.

प्राबच्या अंदाजानुसार, एकूण 73 जागांपैकी:

राष्ट्रवादी काँग्रेस: 47

भाजप: 18

शिवसेना (शिंदे गट): 6

शिवसेना (ठाकरे गट): 1

काँग्रेस: 0

अपक्ष: 1

यामुळे काँग्रेस पुण्यातून हद्दपार होण्याची शक्यता असून, हे राज्यात राजकीय चर्चेला उधाण देऊ शकते.पुणे जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्याचे दिसून आले. अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर दोन्ही गटांनी एकच चिन्ह – घड्याळ – वापरून उमेदवार उभे केले. या सर्व उमेदवारांची जबाबदारी अजित पवारांनी घेतल्याचे सांगितले जाते.

अजित पवारांच्या 28 जानेवारी रोजी झालेल्या अकाली निधनानंतर, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्यातील उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन प्रचार करत असताना अजित पवारांच्या निधनामुळे विलिनीकरणाच्या चर्चेला मागे पडल्याचे जाणवते.पुणे जिल्हा परिषदेचा निकाल सोमवारी येताच राज्यातील राजकीय वातावरण आणखी गरम होण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विड्याचे पान सेवन करण्याची पद्धत

जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…

7 तास ago

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…

7 तास ago

राज्यात जनगणना मोहिमेला सुरुवात; नागरिकांना ‘स्व-गणना’ची सुविधा

मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…

7 तास ago

निष्ठा, समर्पण आणि साधेपणाचा वारसा: यशवंत हाप्पे यांना काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…

7 तास ago

चिमुरडीवरील अत्याचार-हत्येने पुणे हादरले; कायदा-सुव्यवस्था कोलमडली, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…

7 तास ago

बारावी निकाल 89.79% : यशस्वी विद्यार्थ्यांचे दादाजी भुसे यांच्याकडून अभिनंदन

आवडीनुसार पुढील वाटचालीचे आवाहन; मुलींची उत्तीर्णता मुलांपेक्षा 6.35% अधिक मुंबई: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12…

7 तास ago