महाराष्ट्र

माजी मंत्री अशोकराव पाटील डोणगावकरांच्या निधनाने समर्पित लोकसेवक हरपला

मुंबई: काँग्रेस पक्षाचे नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री अशोकराव पाटील डोणगावकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेस विचारांचे एक समर्पित नेतृत्व व लोकसेवक हरपला आहे अशा शोकभावना महराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

अशोक पाटील डोणगावकर यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, डोणगावकरांनी ग्रामपंचायतीपासून सक्रीय राजकारणाला सुरुवात केली. ते सरपंच, दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा बँकेचे संचालक, गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे मंत्री असा प्रदीर्घ राजकीय प्रवास संघर्षशील आणि प्रेरणादायी आहे. त्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या राजकीय, शैक्षणिक, कृषी, सहकार, सामाजिक व क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. सर्वसामान्य लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमी तत्पर असत. आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे या तळमळीने ते सातत्याने विकास कामांचा पाठपुरावा करत.

अशोकराव डोणगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डोणगावकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी सरकार कटिबद्ध; कुटुंबाच्या पुनर्वसनाची हमी; डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…

6 तास ago

विड्याचे पान सेवन करण्याची पद्धत

जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…

13 तास ago

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…

13 तास ago

राज्यात जनगणना मोहिमेला सुरुवात; नागरिकांना ‘स्व-गणना’ची सुविधा

मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…

13 तास ago

निष्ठा, समर्पण आणि साधेपणाचा वारसा: यशवंत हाप्पे यांना काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…

13 तास ago

चिमुरडीवरील अत्याचार-हत्येने पुणे हादरले; कायदा-सुव्यवस्था कोलमडली, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…

13 तास ago