पुणे: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावान, विश्वासू आणि समर्पित सहकारी हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शोकसंदेशात सुनेत्रा अजित पवार यांनी म्हटले आहे की, जालिंदर कामठे यांनी सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा, कार्यनिष्ठा आणि जनसेवेची मूल्ये जपत पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी ग्रामीण विकास, लोककल्याण आणि प्रभावी प्रशासनाला प्राधान्य देत उल्लेखनीय कार्य केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणात त्यांचे मोठे योगदान राहिले. पक्षाच्या विचारांप्रती त्यांची निष्ठा, कार्यकर्त्यांशी असलेला आत्मीय संवाद आणि जनतेच्या प्रश्नांबाबतची संवेदनशीलता कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने पक्षाने एक अनुभवी, निष्ठावान आणि समर्पित कार्यकर्ता गमावला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी सुनेत्रा अजित पवार यांनी जालिंदर कामठे यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत, “या दुःखद प्रसंगी आम्ही सर्वजण कामठे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो,” अशी प्रार्थना केली.
मुंबई : भाजपचे आमदार राम कदम यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर हक्कभंगाची भाषा करून नैतिकतेचा…
रोज भरपूर पाणी पिणं आपल्या शरीरासाठी फार महत्वाचं असतं. कारण याने पचन तंत्र, ब्लड सर्कुलेशन,…
लहान मुले असो वा घरातील मोठ्या व्यक्ती सगळेच आवडीने भेंडीची भाजी खातात. भेंडीची भाजी चवीला…
ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्या अस्वस्थ मनाला शांत करणे.त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो. ध्यानाची पध्दत…
माळशिरस येथे जाहीर पक्षप्रवेश; विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचाही शिवसेनेत प्रवेश मुंबई: महायुती सरकारच्या विकासाभिमुख…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव परिसरात भंगार गोळा करुन उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेवर चाकूचा धाक दाखवत…