महाराष्ट्र

ट्रेलरच्या धडकेत कामगाराचा मृत्यू…

चाकण: चाकण तळेगाव मार्गावर खालुंब्रे, ता. खेड गावच्या हद्दीत आज सकाळी साडेसहाच्या सुमारास कंपनीत कामासाठी निघालेल्या दुचाकीवरील कामगाराचा ट्रेलरच्या धडकेत चाकाखाली गेल्याने जागीच मृत्यू झाला. गजानन बाबुराव बोलकेकर (वय- २७), रा. येलवाडी, ता. खेड, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू पावलेल्या कामगाराचे नाव आहे. त्याच्या शरीराचा अक्षरक्ष: चेंदामेंदा झाला होता. दुचाकी चालक जखमी असून त्याच्यावर चाकण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान ट्रेलर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशी माहिती महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिली. चाकण औद्योगिक वसाहतीतील ऑटोकॉम कार्पोरेशन पानसे प्रा. लिमिटेड या कंपनीत बोलकेकर कामास होता. तळेगाव बाजूकडून तो चाकण बाजूकडे येत होता. दुचाकीच्या पाठीमागे तो बसलेला होता.

ट्रेलर तळेगाव बाजूकडून चाकण बाजूकडे चालला होता. बोलकेकर हे एचआर एक्झिक्युटिव्ह म्हणून कंपनीत काम करत होते. ते सध्या येलवाडी, ता. खेड येथे राहत होते. १८ एप्रिल ला त्यांचा विवाह झाला होता. ते मुळचे बोळका, जि. नांदेड येथील आहे. त्यांच्या मागे आई-वडील, भाऊ, पत्नी असा परिवार आहे. कंपनीचे व्यवस्थापक सुरेश नायर व इतर कामगारांनी या दुर्दैवी घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली.

याबाबत कंपनीचे व्यवस्थापक सुरेश नायर यांनी सांगितले की, ‘चाकण- तळेगाव मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. अनेक कामगारांचे जीव जात आहेत, पण याकडे शासन कोणीच लक्ष देत नाही. एक कामगार गेल्याने त्याचे सगळे कुटुंब उद्ध्वस्त होत आहे याकडे शासनाने आता तरी डोळे उघडून पाहावे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

12 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

12 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

12 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

12 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

12 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

12 तास ago