राजकीय

स्वराज्य संग्राम पक्षाचा शिवसेना महायुतीला पाठिंबा

मुंबई: शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या महायुतीला स्वराज्य संग्राम पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्वराज्य संग्राम पक्षाचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी घोषणा केली.

मागील अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र हिताचे अनेक निर्णय घेतले. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले. शेतकऱ्यांना वीज बिल माफ केले. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला निधी उपलब्ध करुन दिला आणि मराठा समाजाच्या विकासाला चालना दिली. लाडकी बहिण योजना लागू करुन राज्यातील महिलांना न्याय दिला. त्यामुळे महायुतीला स्वराज्य संग्राम पक्ष जाहीर पाठिंबा देत आहे, असे तानाजीराव शिंदे म्हणाले.

शिवसेना महायुतीला सत्तेत आणण्यासाठी स्वराज्य संग्राम पक्ष महायुतीमध्ये सहभागी होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येण्यासाठी स्वराज्य संग्रामचे राज्यभरातील कार्यकर्ते शिवसेना महायुतीच्या विजयासाठी प्रयत्न करतील, असे आवाहन तानाजीराव शिंदे यांनी केले. मुंबई अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचे आंतरराष्ट्रीय स्मारक आणि मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण पुन्हा मिळावे, अशी मागणी तानाजीराव शिंदे यांनी यावेळी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राम मंदिर देणगी प्रकरणी पारदर्शक चौकशीची काँग्रेसची मागणी

मुंबई: अयोध्येतील राम मंदिरासाठी प्राप्त झालेल्या देणग्या, निधीचा वापर आणि कथित आर्थिक अनियमिततांबाबत स्वतंत्र व…

7 तास ago

शिवसेनेकडून संजय राठोड यांच्यावर राष्ट्रीय जबाबदारी; विमुक्त व भटक्या जमातीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई: शिवसेनेचे नेते तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय दुलीचंद राठोड यांच्यावर शिवसेनेने विमुक्त…

7 तास ago

अधिकारी मॅनहोलमध्ये पडल्यानंतर महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या पाहणीदरम्यान एका अधिकाऱ्याचा उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याच्या घटनेनंतर पालिकेच्या पावसाळापूर्व तयारीवर गंभीर प्रश्नचिन्ह…

7 तास ago

दुर्गम हिवाळी पाडा शाळेचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले कौतुक; विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद

मुंबई: नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील हिवाळी पाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नावीन्यपूर्ण…

7 तास ago

कर्जमाफी नव्हे, शेतकऱ्यांची कर्जवसुली योजना; सरकारची दिशाभूल; अंबादास दानवे

मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी…

7 तास ago

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्रापूर पोलिसांचा पुढाकार; मुख्याध्यापकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): विद्यार्थ्यांना सुरक्षित, निर्भय आणि सुसंस्कृत शैक्षणिक वातावरण मिळावे या उद्देशाने शिक्रापूर पोलीस…

7 तास ago