मुंबई: शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या महायुतीला स्वराज्य संग्राम पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्वराज्य संग्राम पक्षाचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी घोषणा केली.
मागील अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र हिताचे अनेक निर्णय घेतले. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले. शेतकऱ्यांना वीज बिल माफ केले. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला निधी उपलब्ध करुन दिला आणि मराठा समाजाच्या विकासाला चालना दिली. लाडकी बहिण योजना लागू करुन राज्यातील महिलांना न्याय दिला. त्यामुळे महायुतीला स्वराज्य संग्राम पक्ष जाहीर पाठिंबा देत आहे, असे तानाजीराव शिंदे म्हणाले.
शिवसेना महायुतीला सत्तेत आणण्यासाठी स्वराज्य संग्राम पक्ष महायुतीमध्ये सहभागी होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येण्यासाठी स्वराज्य संग्रामचे राज्यभरातील कार्यकर्ते शिवसेना महायुतीच्या विजयासाठी प्रयत्न करतील, असे आवाहन तानाजीराव शिंदे यांनी केले. मुंबई अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचे आंतरराष्ट्रीय स्मारक आणि मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण पुन्हा मिळावे, अशी मागणी तानाजीराव शिंदे यांनी यावेळी केली.
मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…