राजकीय

स्वराज्य संग्राम पक्षाचा शिवसेना महायुतीला पाठिंबा

मुंबई: शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या महायुतीला स्वराज्य संग्राम पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्वराज्य संग्राम पक्षाचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी घोषणा केली.

मागील अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र हिताचे अनेक निर्णय घेतले. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले. शेतकऱ्यांना वीज बिल माफ केले. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला निधी उपलब्ध करुन दिला आणि मराठा समाजाच्या विकासाला चालना दिली. लाडकी बहिण योजना लागू करुन राज्यातील महिलांना न्याय दिला. त्यामुळे महायुतीला स्वराज्य संग्राम पक्ष जाहीर पाठिंबा देत आहे, असे तानाजीराव शिंदे म्हणाले.

शिवसेना महायुतीला सत्तेत आणण्यासाठी स्वराज्य संग्राम पक्ष महायुतीमध्ये सहभागी होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येण्यासाठी स्वराज्य संग्रामचे राज्यभरातील कार्यकर्ते शिवसेना महायुतीच्या विजयासाठी प्रयत्न करतील, असे आवाहन तानाजीराव शिंदे यांनी केले. मुंबई अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचे आंतरराष्ट्रीय स्मारक आणि मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण पुन्हा मिळावे, अशी मागणी तानाजीराव शिंदे यांनी यावेळी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अहिल्यानगरमधील गंभीर गुन्ह्यातील आरोपी पुणे LCB जाळ्यात

शिरुर (तेजस फडके): अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या खुनाचा प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील…

3 तास ago

पुणे; दूध भेसळ प्रकरणात कारवाईचा फास आवळला; ११ आरोपींना न्यायालयीन कोठडी तर १४ आरोपी यापुर्वीच येरवडा कारागृहात

मंचर (प्रतिनिधी): दूधात भेसळ करुन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या टोळीविरुद्ध मंचर पोलिसांनी सुरु केलेल्या कारवाईला…

5 तास ago

शिरुर बायपासवर बेकायदेशीर रस्ता दुभाजक तोडल्याने चार वाहनांच्या विचित्र अपघातात दोघांचा बळी

शिरुर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील शिरुर बायपास येथे संग्राम हॉटेलसमोर मंगळवार (दि ११) झालेल्या चार…

5 तास ago

आयुर्वेदिक औषध कंपन्यांवर FDAचा हातोडा; 10 संस्थांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

मुंबई : राज्यातील आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांच्या मनमानी कारभाराविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी…

6 तास ago

स्वाभिमानीच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर १२ ठराव; कर्जमाफीसह शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाच्या दोन दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठकीत शेतकरी, शेतमजूर…

6 तास ago

भीमा नदीत वाहून गेलेल्या साहेबराव मुळीक यांचा तीन दिवसांनी मृतदेह सापडला

शिरूर : भीमा नदीपात्रात टाकलेली मोटार काढण्यासाठी गेलेल्या दहिवडी (ता. शिरूर) येथील साहेबराव बबन मुळीक…

6 तास ago