मुंबई : शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. या खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांनी अधिकृत मान्यता दिल्यानंतर ठाकरे गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला तातडीने स्थगिती देण्यास नकार दिला आहे.
ठाकरे गटाच्या वतीने लोकसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी मान्य केलेली नाही. तसेच लोकसभा अध्यक्ष आणि संबंधित सहा खासदारांनी या प्रकरणी दोन आठवड्यांत उत्तर दाखल करावे, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
दरम्यान, ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाकडे असलेल्या नऊ खासदारांपैकी सहा खासदारांनी शिंदे गटाची साथ स्वीकारली. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाची लोकसभेतील ताकद वाढून खासदारांची संख्या १३ वर पोहोचली आहे.
सुप्रीम कोर्टाने लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला सध्या स्थगिती न दिल्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, या प्रकरणातील अंतिम निर्णयासाठी पुढील सुनावणीकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांकडून मागणीची दखल; अविनाश रणखांब यांची नव्या एमडीपदी नियुक्ती मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागांशी संबंधित ८…
मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांनी एकसमान शैक्षणिक…
आजकाल महागाईसोबत रोगराई पण वाढत चालली आहे. प्रत्येक आजारासाठी अलोपॅथीच्या महागात महाग गोळ्या बनवल्या जात…
व्हिटॅमिन बी-१२ हे 'सायनोकोबालामिन' म्हणून ओळखले जाते. हे पेशी पर्यंतचे चयापचय, विशेषतः DNA संश्लेषण (अनुवंशिक…
रोजच्या जेवणात वेगवेगळ्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी आलं घातलं जातं. खरंतर, 'आलं' मसाल्यांच्या पदार्थांपैकी एक असून…