उपअधिक्षक व एका कर्मचाऱ्याला प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड
शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत शिरूर तालुक्यातील नवनाथ तुकाराम डोमाळे यांच्या द्वितीय अपील अर्जात जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, पुणे यांनी ऐतिहासिक निर्णय देत, कामकाजात दिरंगाई करणा-या शिरूर भुमिअभिलेख उपअधिक्षक अमोल भोसले व एका कर्मचाऱ्याला प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. नागरिकांना वेळेवर हक्काची सेवा न दिल्याने हा निर्णय घेतला गेला असून, हा निर्णय अनेक नागरिकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
डोमाळे यांनी विविध मोजणी प्रकरणांतील प्रमाणित नक्कल, हरकत अर्जांची प्रती आणि मोजणी नकाशे मिळण्यासाठी अर्ज सादर केला होता. मात्र पदनिर्देशित अधिकारी आणि प्रथम अपीलीय अधिकारी तथा उप अधीक्षक भूमी अभिलेख अमोल भोसले यांनी वेळेत योग्य सेवा पुरवली नाही. त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे, अपूर्ण कागदपत्रे आणि चुकीची माहिती दिली गेल्याचेही अपीलात अधोरेखित करण्यात आले होते.
जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख पुणे तथा द्वितीय अपील अधिकारी मंगला कमाने यांनी सदर प्रकरणात सुनावणी घेत, उपलब्ध पुराव्याच्या आधारे अपीलदाराच्या बाजूने निर्णय दिला. त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, संबंधित अधिकारी यांनी नियमबाह्य पद्धतीने कामकाजात दिरंगाई केल्यामुळे त्यांच्यावर प्रत्येकी ५०० दंड आकारण्यात येत आहे. याशिवाय अपूर्ण नक्कला आणि हरकत अर्जांची सर्व माहिती तीन दिवसांत अपीलदाराला पुरवावी, असेही आदेशात नमूद केले आहे.
यापुढील काळात अधिसूचित सेवांसाठी कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असे ठामपणे नमूद करत अधिकाऱ्यांना भविष्यातील सेवा वेळेत देण्यास सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. एकुणच शिरूर भुमि अभिलेख कार्यालयात अनेक नागरिकांची कामे बऱ्याच महीन्यांपासून प्रलंबित असून नागरीकांना कामासाठी हेलपाटे मारण्याची वेळ येत असल्याचे कवठे येमाई येथील शेतकरी दत्तात्रय वामन सांडभोर यांनी सांगितले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात जाहीर पक्षप्रवेश; विकासाच्या राजकारणावर विश्वास व्यक्त ठाणे: राज्यातील राजकीय…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे श्रेय घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न म्हणजे "बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना" असल्याची टीका…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील क्रिकेट स्पर्धेच्या वादातून बेकायदेशीर पिस्तुलाने गोळीबार…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शुभारंभ; दीड वर्षांत वाहतूक कोंडी कमी करण्याचे उद्दिष्ट, जलपुरवठा व क्रीडा…
भरतीच्या नावाखाली केवळ घोषणांचा पाऊस; NET-SET, Ph.D. धारकांची फसवणूक होत असल्याचा ॲड. अमोल मातेले यांचा…
नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची देशभर चर्चा रंगली…