उपअधिक्षक व एका कर्मचाऱ्याला प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड
शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत शिरूर तालुक्यातील नवनाथ तुकाराम डोमाळे यांच्या द्वितीय अपील अर्जात जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, पुणे यांनी ऐतिहासिक निर्णय देत, कामकाजात दिरंगाई करणा-या शिरूर भुमिअभिलेख उपअधिक्षक अमोल भोसले व एका कर्मचाऱ्याला प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. नागरिकांना वेळेवर हक्काची सेवा न दिल्याने हा निर्णय घेतला गेला असून, हा निर्णय अनेक नागरिकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
डोमाळे यांनी विविध मोजणी प्रकरणांतील प्रमाणित नक्कल, हरकत अर्जांची प्रती आणि मोजणी नकाशे मिळण्यासाठी अर्ज सादर केला होता. मात्र पदनिर्देशित अधिकारी आणि प्रथम अपीलीय अधिकारी तथा उप अधीक्षक भूमी अभिलेख अमोल भोसले यांनी वेळेत योग्य सेवा पुरवली नाही. त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे, अपूर्ण कागदपत्रे आणि चुकीची माहिती दिली गेल्याचेही अपीलात अधोरेखित करण्यात आले होते.
जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख पुणे तथा द्वितीय अपील अधिकारी मंगला कमाने यांनी सदर प्रकरणात सुनावणी घेत, उपलब्ध पुराव्याच्या आधारे अपीलदाराच्या बाजूने निर्णय दिला. त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, संबंधित अधिकारी यांनी नियमबाह्य पद्धतीने कामकाजात दिरंगाई केल्यामुळे त्यांच्यावर प्रत्येकी ५०० दंड आकारण्यात येत आहे. याशिवाय अपूर्ण नक्कला आणि हरकत अर्जांची सर्व माहिती तीन दिवसांत अपीलदाराला पुरवावी, असेही आदेशात नमूद केले आहे.
यापुढील काळात अधिसूचित सेवांसाठी कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असे ठामपणे नमूद करत अधिकाऱ्यांना भविष्यातील सेवा वेळेत देण्यास सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. एकुणच शिरूर भुमि अभिलेख कार्यालयात अनेक नागरिकांची कामे बऱ्याच महीन्यांपासून प्रलंबित असून नागरीकांना कामासाठी हेलपाटे मारण्याची वेळ येत असल्याचे कवठे येमाई येथील शेतकरी दत्तात्रय वामन सांडभोर यांनी सांगितले आहे.
मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…
शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…
मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…
मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…
गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…
मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…