शिरूर तालुका

शिरुर तालुक्यातील त्या अपघातातील आणखी एकाचा मृत्यू, मृतांची संख्या पोहचली सहावर…

शिरुर (अरुणकुमार मोटे): आमदाबाद (ता. शिरूर) येथील युवक गुढीपाडव्याच्या दिवशी देवदर्शनाला गेल्यांनतर गाडीचा अपघात होऊन जागीच चार जण ठार झालेले असताना (दि. २५) रोजी जखमी असलेला युवक समाधान श्रावण साळवे हा उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडला असताना पुन्हा आमदाबादकरांना धक्का बसला असून अपघातातील गंभीर जखमी असलेला दुसरा युवक ओंकार जालीधंर गोरखे (वय १८) याचे नगर येथे उपचार सुरू असताना (दि. २६) रोजी उपचारादरम्यान निधन झाले आहे. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या आता सहा वर गेली आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी दिवशी (दि. २३) आमदाबाद येथील तरुण छोट्या टेम्पोतून शनिशिंगणापूर व देवगड येथे देवदर्शनासाठी गेले होते. तेथून परतताना रात्री साडेबाराच्या सुमारास पुणे-नगर रस्त्यावर कामरगावजवळ झालेल्या या अपघातात विजय अवचिते, राजेंद्र साळवे, मयूर साळवे व धीरज मोहिते यांचा मृत्यू झाला, तर सातजण जखमी झाले होते. जखमींपैकी तिघांवर अतिदक्षता विभागात उपचार चालू होते. त्यातील समाधान साळवे याचा शनिवारी तर रविवारी ओंकार जालिंदर गोरखे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

ओंकार हा शिक्षण घेत होता. तसेच वाजंत्री म्हणुन काम करीत होता. गावातील युवा कलावंत अपघातात मरण पावल्याने आमदाबाद ग्रामस्थांवर मोठी शोककळा पसरली आहे. तो अकरावीत होता व वाजंत्री कलाकार म्हणून परिसरात प्रसिद्ध होता. आमदाबाद गावातील हे तरुण युवा कलावंत अपघातात मरण पावल्याने आमदाबाद ग्रामस्थ, नातेवाईकांवर मोठा दु :खाचा डोंगर छोसळला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राम मंदिर देणगी प्रकरणी पारदर्शक चौकशीची काँग्रेसची मागणी

मुंबई: अयोध्येतील राम मंदिरासाठी प्राप्त झालेल्या देणग्या, निधीचा वापर आणि कथित आर्थिक अनियमिततांबाबत स्वतंत्र व…

11 तास ago

शिवसेनेकडून संजय राठोड यांच्यावर राष्ट्रीय जबाबदारी; विमुक्त व भटक्या जमातीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई: शिवसेनेचे नेते तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय दुलीचंद राठोड यांच्यावर शिवसेनेने विमुक्त…

11 तास ago

अधिकारी मॅनहोलमध्ये पडल्यानंतर महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या पाहणीदरम्यान एका अधिकाऱ्याचा उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याच्या घटनेनंतर पालिकेच्या पावसाळापूर्व तयारीवर गंभीर प्रश्नचिन्ह…

11 तास ago

दुर्गम हिवाळी पाडा शाळेचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले कौतुक; विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद

मुंबई: नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील हिवाळी पाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नावीन्यपूर्ण…

11 तास ago

कर्जमाफी नव्हे, शेतकऱ्यांची कर्जवसुली योजना; सरकारची दिशाभूल; अंबादास दानवे

मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी…

11 तास ago

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्रापूर पोलिसांचा पुढाकार; मुख्याध्यापकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): विद्यार्थ्यांना सुरक्षित, निर्भय आणि सुसंस्कृत शैक्षणिक वातावरण मिळावे या उद्देशाने शिक्रापूर पोलीस…

11 तास ago