शिरूर तालुका

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या प्रसिद्धी प्रमुखपदी अर्जुन बढे

शिरुर (तेजस फडके): अखिल भारतीय मराठा महासंघाची शिरुर तालुका कार्यकारणी नुकतीच जाहिर करण्यात आली असून प्रसिद्धीप्रमुख पदी राज्य मराठी पत्रकार संघाचे शिरूर तालुका अध्यक्ष अर्जुन बढे यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष गुलाब गायकवाड पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस शोभना पांचगे पुणे जिल्हा महिला अध्यक्षा शैलजा दुर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरूर तालुका अध्यक्ष श्यामकांत वर्पे यांनी अर्जुन बढे यांना निवडीचे पत्र दिले मराठा संघाने सोपवलेली जबाबदारी आपण चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचे आश्वासन अर्जुन बढे यांनी यावेळी दिले.

अर्जुन बढे गेल्या 15 वर्षांपासून पत्रकार क्षेत्रात कार्यरत असून पाच वर्षे पारनेर तालुक्यातील प्रसिद्ध भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश शिंदे, तालुका युवक अध्यक्ष गणेश सरोदे, माजी तालुका अध्यक्ष सुदाम कोलते, महिला तालुका अध्यक्षा उर्मिला फलके, शिक्षक संघटनेच्या ज्योती वाळके, शिरुर शहराध्यक्षा साधना शितोळे, तालुका उपाध्यक्ष सुधीर तांबे, सरचिटणीस संतोष झंजाड, स्नेहा लंघे, गंगाधर शिंदे, जयश्री थेऊरकर, भारती बारवकर रुपाली चौधरी यांच्यासह मराठा समाजाचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सर्वांनी नूतन कार्यकारणीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

5 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

8 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

8 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

8 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

9 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

9 तास ago