मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे पाण्यातून विषबाधा ९ शेळ्यांसह ५ मेंढ्यांचा मृत्यू…

शिरुर (अरुणकुमार मोटे) एकीकडे दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे तहानलेल्या शेळ्या मेंढ्यानी शेतात साचलेले पाणी पिल्याने विषबाधा होऊन मेंढपाळ अंकुश सोमा कोकरे यांच्या ९ शेळ्या व ५ मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. तसेच मलठण येथे उष्माघाताने ४ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ( दि ३) घडली होती. या दुर्दैवी घटनेने मेंढपाळांचे अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याने परीसरातुन हळहळ व्यक्त होत आहे

 

पिंपरखेड येथील मेंढपाळ अंकुश सोमा कोकरे हे शुक्रवारी संध्याकाळी शेतात मेंढ्यांचा कळप चारत होते. दिवसभराच्या कडक उष्णतेमुळे तहानलेल्या वीस शेळ्या तसेच मेंढ्या यावेळी शेजारील ऊसाच्या शेतातील सरीत साचलेले पाणी पिल्या. त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांत ९ शेळ्या व ५ मेंढ्यांना त्रास होऊन त्या गतप्राण झाल्या. मेंढपाळ कोकरे यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ रावसाहेब गावडे यांना तत्काळ बोलावून घेत इतर मेंढ्यावर उपचार केले. सदर शेळ्या मेंढ्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृत्यू रासायनिक खत किंवा औषधाच्या दूषित पाण्यातून विषबाधा होऊन झाला आहे असे पिंपरखेड येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ रावसाहेब गावडे यांनी सांगितले.

 

दरम्यान मलठण (ता. शिरुर) येथील शिंदेवाडीतील मेंढपाळ महेश भाऊसाहेब शिंदे यांच्या ४ शेळ्यांचा शुक्रवारी (दि ३) अचानक मृत्यू झाला.कांद्याची पात खाल्ल्याने तसेच उष्णता वाढल्याने उष्माघाताने ही घटना घडल्याचे डॉ प्रकाश उचाळे यांनी सांगितले.

 

शिरुरचे पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉक्टर नितीन पवार यांच्या सुचनेनुसार दोन्हीही घटनांची नोंद घेत पंचनामा करुन शवविच्छेदन करण्यात आले आहे. मेंढपाळ अंकुश कोकरे मेंढपाळ शिंदे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असुन शासनाने त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांकडुन होत आहे.

 

उन्हाळ्यात जनावरांची काळजी घ्या…

उन्हाळा कडक असल्यामुळें जनावरांना आवश्यकतेनुसार पाणी पाजावे प्रथम पाणी दुषित आहे का याची खात्री करुनच पाणी पाजले पाहिजे. तसेच उन्हाच्या वेळी कांद्याची पात शेळ्या-मेंढ्यांना चारु नये. तसेच दुपारच्या कडक उन्हात शेळ्या-मेंढ्या चारण्याऐवजी सावलीला बसवाव्यात असे आवाहन शिरुरचे पशुधन विकास अधिकारी ऋषिकेश जगताप यांनी केले आहे.

Video; केंद्र सरकारने शेतक-याच्या ताटात माती कालवली; अमोल कोल्हे

ट्रेलर बघताच आढळराव पाटलांची बोलती बंद असं का म्हणाले अमोल कोल्हे

Video; कितीही रडीचे डाव खेळा,येणार तर दणकून येणार, अन जनतेतून येणार; डॉ अमोल कोल्हे

शिरुर; शेतकऱ्याचे महाडीबीटी योजनेतील 24 हजार अनुदान वर्षभरातही सरकारला देता येईना

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

6 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

6 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

7 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

12 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

12 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

12 तास ago