मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे पाण्यातून विषबाधा ९ शेळ्यांसह ५ मेंढ्यांचा मृत्यू…

शिरुर (अरुणकुमार मोटे) एकीकडे दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे तहानलेल्या शेळ्या मेंढ्यानी शेतात साचलेले पाणी पिल्याने विषबाधा होऊन मेंढपाळ अंकुश सोमा कोकरे यांच्या ९ शेळ्या व ५ मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. तसेच मलठण येथे उष्माघाताने ४ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ( दि ३) घडली होती. या दुर्दैवी घटनेने मेंढपाळांचे अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याने परीसरातुन हळहळ व्यक्त होत आहे

 

पिंपरखेड येथील मेंढपाळ अंकुश सोमा कोकरे हे शुक्रवारी संध्याकाळी शेतात मेंढ्यांचा कळप चारत होते. दिवसभराच्या कडक उष्णतेमुळे तहानलेल्या वीस शेळ्या तसेच मेंढ्या यावेळी शेजारील ऊसाच्या शेतातील सरीत साचलेले पाणी पिल्या. त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांत ९ शेळ्या व ५ मेंढ्यांना त्रास होऊन त्या गतप्राण झाल्या. मेंढपाळ कोकरे यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ रावसाहेब गावडे यांना तत्काळ बोलावून घेत इतर मेंढ्यावर उपचार केले. सदर शेळ्या मेंढ्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृत्यू रासायनिक खत किंवा औषधाच्या दूषित पाण्यातून विषबाधा होऊन झाला आहे असे पिंपरखेड येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ रावसाहेब गावडे यांनी सांगितले.

 

दरम्यान मलठण (ता. शिरुर) येथील शिंदेवाडीतील मेंढपाळ महेश भाऊसाहेब शिंदे यांच्या ४ शेळ्यांचा शुक्रवारी (दि ३) अचानक मृत्यू झाला.कांद्याची पात खाल्ल्याने तसेच उष्णता वाढल्याने उष्माघाताने ही घटना घडल्याचे डॉ प्रकाश उचाळे यांनी सांगितले.

 

शिरुरचे पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉक्टर नितीन पवार यांच्या सुचनेनुसार दोन्हीही घटनांची नोंद घेत पंचनामा करुन शवविच्छेदन करण्यात आले आहे. मेंढपाळ अंकुश कोकरे मेंढपाळ शिंदे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असुन शासनाने त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांकडुन होत आहे.

 

उन्हाळ्यात जनावरांची काळजी घ्या…

उन्हाळा कडक असल्यामुळें जनावरांना आवश्यकतेनुसार पाणी पाजावे प्रथम पाणी दुषित आहे का याची खात्री करुनच पाणी पाजले पाहिजे. तसेच उन्हाच्या वेळी कांद्याची पात शेळ्या-मेंढ्यांना चारु नये. तसेच दुपारच्या कडक उन्हात शेळ्या-मेंढ्या चारण्याऐवजी सावलीला बसवाव्यात असे आवाहन शिरुरचे पशुधन विकास अधिकारी ऋषिकेश जगताप यांनी केले आहे.

Video; केंद्र सरकारने शेतक-याच्या ताटात माती कालवली; अमोल कोल्हे

ट्रेलर बघताच आढळराव पाटलांची बोलती बंद असं का म्हणाले अमोल कोल्हे

Video; कितीही रडीचे डाव खेळा,येणार तर दणकून येणार, अन जनतेतून येणार; डॉ अमोल कोल्हे

शिरुर; शेतकऱ्याचे महाडीबीटी योजनेतील 24 हजार अनुदान वर्षभरातही सरकारला देता येईना

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

11 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

19 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago