नागरिकांना बस उपलब्ध करुन देण्यास प्रशासनाची तारांबळ
शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील शौर्यदिनी विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पुराविण्यात आलेल्या बस अपुऱ्या पडल्याने बसचे नियोजन कोलमडल्याचे दिसून आले असून नागरिकांना बस उपलब्ध करुन देण्यासाठी पोलिसांसह प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे 1 जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचाराच्या नंतर प्रशासनाने कमालीची खबरदारी घेतलेली असताना येणाऱ्या समाज बांधवांसाठी शिक्रापूर व लोणीकंद येथे स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करुन तेथून शासनाच्या वतीने ठेवण्यात आलेल्या बसच्या माध्यमातून समाज बांधवांना जयस्तंभ जवळ आणून सोडले जात आहे. मागील वर्षी कोरोनाचे निर्बंध असताना देखील मोठ्या प्रमाणात नागरिक येथे अभिवादन करण्यासाठी आले होते.
परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणात समाज बांधव येणार असल्याचे बोलले जात असताना प्रशासनाने दोन्ही बाजूने 140 अशा सुमारे 280 बसची व्यवस्था केलेली होती. मात्र दुपार नंतर अचानकपणे नागरिकांची गर्दी वाढू लागल्याने बसेस देखील कमी पडू लागल्या. त्यामुळे नागरिकांना बस उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली तर नागरिकांनी देखील लवकर बस उपलब्ध होण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे दिसले, तर घडलेल्या प्रकारामुळे बसचे नियोजन कोलमडल्याचे दिसून आले.
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात जुगार, हातभट्टी दारू, ताडी तसेच अवैध मद्यविक्रीचे धंदे…
शिक्रापूर (ओमकार भोरडे): महावितरणच्या रोहित्र (डीपी) चोरीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी महावितरण व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त…
शिरुर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून, एका तीन…
मुंबई : धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तक…
तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, कोरेगाव भीमा व तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजारांमध्ये वाढत्या…
शिरूर (अरुणकुमार मोटे): "तुझ्या चुकीच्या सांगण्यामुळे मला कंपनीतून कामावरून काढण्यात आले," असा जाब विचारत एका…