शिरूर तालुका

कोरेगाव भीमाच्या कार्यक्रमात बसचे नियोजन कोलमडले

नागरिकांना बस उपलब्ध करुन देण्यास प्रशासनाची तारांबळ

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील शौर्यदिनी विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पुराविण्यात आलेल्या बस अपुऱ्या पडल्याने बसचे नियोजन कोलमडल्याचे दिसून आले असून नागरिकांना बस उपलब्ध करुन देण्यासाठी पोलिसांसह प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे 1 जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचाराच्या नंतर प्रशासनाने कमालीची खबरदारी घेतलेली असताना येणाऱ्या समाज बांधवांसाठी शिक्रापूर व लोणीकंद येथे स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करुन तेथून शासनाच्या वतीने ठेवण्यात आलेल्या बसच्या माध्यमातून समाज बांधवांना जयस्तंभ जवळ आणून सोडले जात आहे. मागील वर्षी कोरोनाचे निर्बंध असताना देखील मोठ्या प्रमाणात नागरिक येथे अभिवादन करण्यासाठी आले होते.

परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणात समाज बांधव येणार असल्याचे बोलले जात असताना प्रशासनाने दोन्ही बाजूने 140 अशा सुमारे 280 बसची व्यवस्था केलेली होती. मात्र दुपार नंतर अचानकपणे नागरिकांची गर्दी वाढू लागल्याने बसेस देखील कमी पडू लागल्या. त्यामुळे नागरिकांना बस उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली तर नागरिकांनी देखील लवकर बस उपलब्ध होण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे दिसले, तर घडलेल्या प्रकारामुळे बसचे नियोजन कोलमडल्याचे दिसून आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…

3 तास ago

बंगालमध्ये तृणमूल पिछाडीवर! वाघासारखं लढत राहू;  ममता बॅनरजी यांची प्रतिक्रिया

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…

3 तास ago

भोर नसरापूर प्रकरण! आरोपीला फाशीचीच शिक्षा होणार;  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर…

3 तास ago

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपावर काँग्रेसचा हल्लाबोल; सपकाळांचा गंभीर आरोप

मुंबई: काँग्रेस आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत होती, मात्र २०१४ नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर…

3 तास ago

नातं हृदयाशी; बायपास सर्जरी

बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…

7 तास ago

दक्षिणेत भाजपाला नकार, केरळमध्ये काँग्रेसचा विजय लोकशाहीचा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर…

7 तास ago