राजकीय

मानवंदनेसाठी शासनाचे कोणी येईल याचा विचार करत नाही…

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची खोचक टीका

शिक्रापूर (शेरखान शेख): नवीन वषार्ची सुरुवात ही एका ऊर्जादायी दिवसाने तसेच कोरेगाव भीमा विजय स्तंभाला अभिवादन करत केली असून मी करणी सेने सारख्या चिल्लर लोकांवर काही बोलणार नाही आणि याठिकाणी शासनाच्या वतीने कोणी येईल की नाही याचा विचार करत नसल्याचे शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील जयस्तंभ येथे अभिवादन करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे उपस्थित होत्या. यावेळी करणी सेनेवर बोलण्याचे त्यांनी टाळले पण पण यांचे जे बोलविके धनी आहेत त्या भाजपा मधल्या कोणत्याही प्रतिनिधीने हे बोलून दाखवले मग त्यांना आंबेडकरी जनता काय आहे हे दाखवून देवू असे सांगत सत्तेतील कोणताही नेता येथे येणे अपेक्षित नाही कारण सरकारच पेशवाईचे असुन ज्या पेशवाईचा पाढाव म्हणून हा विजयस्तंभ उभारला गेला त्याच पेशवाईचा वसा आणि वारसा चालविणारे लोक असल्याचे अंधारे यांनी सांगत मला गेली 4 वर्षे याठिकाणी मज्जाव करण्यात येत होता. मात्र यावर्षी मज्जाव केला नसल्याने याठिकाणी नतमस्तक होता आले.

 

याठिकाणी येण्यासाठी बसच्या फेऱ्या अपुऱ्या पडत असताना सुरक्षेच्या कारणास्तव याठिकाणी लोकांना येण्यापासुन मज्जाव तर प्रशासन करत नाही ना असा सवाल यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. दरम्यान अंधारे यांचा सदर ठिकाणी विजयस्तंभाची प्रतिकृती देत सन्मान करण्यात आला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

21 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

21 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

21 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

21 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

23 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

23 तास ago