शिरुर (किरण पिंगळे-शेलार) रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने कामाच्या शोधात, गावोगावी जाऊन तिथे पाल मांडून काम करत असतात. हि लोक जास्त दिवस एका ठिकाणी रहात नाही. त्यामुळे अशी मुल शिक्षण घेण्यापासून वंचित असतात. या मुलांना शिक्षण नसल्यामुळे बालदिन काय असतो हे माहित नसते रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने या मुलांना चॉकलेट, बिस्कीट, दिवाळी फराळ वाटप करुन बालदीन (दि 14) रोजी साजरा करण्यात आला.
रामलिंग येथे वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने अनेक कुटुंब वास्तव्यास आलेली आहेत. हालाकीच्या परिस्थितीमुळे हि मुले शालेय शिक्षणापासुन वंचित आहेत. यावेळी या मुलांसोबत रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले यांनी संवाद साधला. त्यावेळी त्या मुलांनी सांगितले आम्हाला शाळेत जायला आवडते. पण घरचे पाठवत नाहीत. या मुलांचे आई-वडील बाहेर फिरुन काम करतात. त्यांना स्वतःचे पोट कसे भरणार याची चिंता असते. त्यामुळे सरकारने या मुलांच्या शिक्षणासाठी उपाय योजना करणे आवश्यक आहे. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, गायत्री डींगरे, पूनम औटी, आरती चव्हाण, ऋतुजा देशमाने उपस्थित होत्या.
मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…
ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…
मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…