शिरुर (किरण पिंगळे-शेलार) रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने कामाच्या शोधात, गावोगावी जाऊन तिथे पाल मांडून काम करत असतात. हि लोक जास्त दिवस एका ठिकाणी रहात नाही. त्यामुळे अशी मुल शिक्षण घेण्यापासून वंचित असतात. या मुलांना शिक्षण नसल्यामुळे बालदिन काय असतो हे माहित नसते रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने या मुलांना चॉकलेट, बिस्कीट, दिवाळी फराळ वाटप करुन बालदीन (दि 14) रोजी साजरा करण्यात आला.
रामलिंग येथे वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने अनेक कुटुंब वास्तव्यास आलेली आहेत. हालाकीच्या परिस्थितीमुळे हि मुले शालेय शिक्षणापासुन वंचित आहेत. यावेळी या मुलांसोबत रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले यांनी संवाद साधला. त्यावेळी त्या मुलांनी सांगितले आम्हाला शाळेत जायला आवडते. पण घरचे पाठवत नाहीत. या मुलांचे आई-वडील बाहेर फिरुन काम करतात. त्यांना स्वतःचे पोट कसे भरणार याची चिंता असते. त्यामुळे सरकारने या मुलांच्या शिक्षणासाठी उपाय योजना करणे आवश्यक आहे. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, गायत्री डींगरे, पूनम औटी, आरती चव्हाण, ऋतुजा देशमाने उपस्थित होत्या.
ठाणे: ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या आनंदआश्रमात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी…
मुंबईतील एनएससीआय डोम येथे होणार प्रारंभ; युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना प्रतिज्ञेत सहभागी होण्याचे मंत्री मंगलप्रभात…
मुंबई: देशभरात सध्या जंतर-मंतरवरील आंदोलनाची चर्चा रंगली आहे. काही आंदोलनकर्त्यांनी वापरलेल्या अश्लील, अपमानास्पद आणि खालच्या…
७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…
शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…
शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…