शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावातील ट्रान्सफॉर्मरमधून तांब्याच्या कॉइल चोरीची घटना उघडकीस आली आहे. यामुळे वीजपुरवठा खंडित होऊन स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे. ही चोरी १८ मार्च रात्री ११ : ३० ते १९ मार्च रोजी सकाळी ८: ३० या वेळेत घडली असल्याचे समोर आले आहे. याबाबत अनिल अशोक घोबाळे (वय ३३), व्यवसाय – नोकरी, रा. कवठे येमाई, (ता. शिरूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,आमदाबाद गट नंबर ६३ मधील २५ / २२ के.व्ही.ए. क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरमधून अज्ञात चोरट्यांनी तांब्याच्या कॉइलची चोरी केली. चोरी करण्याआधी चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल सांडून मोठे नुकसान केले. या घटनेची नोंद शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 208/2025 अंतर्गत करण्यात आली असून भारतीय विद्युत अधिनियम 2003 चे कलम 136 आणि भारतीय दंड संहिता कलम 324 (3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार उबाळे हे करत आहे.
वीजपुरवठ्यावर परिणाम
ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या कॉइल चोरीच्या घटनांमुळे वीजपुरवठा खंडित होतो, परिणामी स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या घटनेमुळे अमदाबाद गावातील वीजपुरवठा विस्कळीत झाला असून, त्याचा परिणाम शेतकरी आणि स्थानिक व्यवसायांवरही झाला आहे.
शिरूर तालुक्यात ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि वीज वितरण कंपन्यांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. चोरी रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, गस्त वाढवणे आणि स्थानिक नागरिकांचे सहकार्य घेणे यांसारख्या उपाययोजना केल्या गेल्यास अशा घटनांना आळा बसू शकतो.
पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, लवकरच आरोपींना गजाआड करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिक नागरिकांनी अशा संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने शिरूर पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील…
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…