भूमीहीन व बेघर दिव्यांगांचे पुण्यात दिव्यांग जन आंदोलन
शिक्रापूर (शेरखान शेख): प्रहार अपंग क्रांती आंदोलन आयोजित पुणे जिल्ह्यातील भूमिहीन व बेघर दिव्यांगांच्या घरासाठी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिव्यांग जन आंदोलन करण्यात आले असून यावेळी दिव्यांग बांधवांना हक्काचे घर मिळावे अशी मागणी प्रहार संघटनेचे पच्छिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांनी केली आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे नुकतेच अपंग संघटनेने आंदोलन केले असून सध्या हजारो दिव्यांगाना राहण्यासाठी स्वतःचे घर नसून ते बेघर आहेत, तर दिव्यांगांचा राहण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिव्यांग बांधव झोपडी टाकून राहत आहे तर कोणी मंदिर, एस टी स्थानक, बस स्थानकांसह सार्वजनिक ठिकाणी जेथे सोय होईल तेथे निवारा शोधत आहे. दिव्यांग बांधवांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी दिव्यांगांना घरे देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले होते मात्र अद्यापही त्याबाबत काही उपाययोजना नसल्याने भूमिहीन व बेघर दिव्यांगांच्या घरासाठी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन करण्यात आले.
सदर आंदोलनात प्रहार संघटनेच्या सुरेखा ढवळे, पुणे जिल्हाध्यक्ष अनिता कदम, जिल्हा कार्याध्यक्ष सुप्रियाताई लोखंडे, दौंड तालुकाध्यक्ष सुभाष दिवेकर, शिरूर तालुकाध्यक्ष कुंडलिक वायकुळे, खेड तालुकाध्यक्ष जीवन टोपे, भोर तालुकाध्यक्ष बापू कुदळे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, जिल्हा सचिव विजय तांबे, हवेली तालुकाध्यक्ष दत्ता सूर्यवंशी, शिक्रापूरचे सुरेश पाटील, बाळासाहेब काळभोर, नंदू राऊत, शिवाजी शिंदे, ज्योती हिवरे, बापू कोकरे, दत्ता बहिरट, नंदू कोळेकर, शरद दिवेकर यांसह आदी दिव्यांग पदाधिकारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना दिव्यांग बांधवांच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…
मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…
मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…