शिरूर तालुका

ग्राहकांना वेठीस धरणारे संप बेकायदेशीर; रमेश टाकळकर

संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी 

शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या राज्यभरात सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला असून सदर संप बेकायदेशीर असल्याने संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या महसूल समितीचे मध्य प्रांत प्रमुख रमेश टाकळकर यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

महाराष्ट्र राज्यात सर्वत्र महसूल, शिक्षण, आरोग्य, ग्रामपंचायत यांसह आदी शासकीय विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांचा संप सुरु असून नागरिकांची शासकीय कामे रखडली असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासांचा सामना करावा लागत आहे. दैनंदिन कामात ग्राहकांना वेठीस धरणारे संप बेकायदेशीरच असल्याने शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सविनय कायदे पालनाने आपल्या मागण्या शासन दरबारी मांडाव्यात ग्राहकांना वेठीस धरुन केलेल्या संपाचे समर्थन कधीही करता येणार नाही.

शासनाने बेकायदेशीर पणे केलेल्या संपकरी कर्मचारी अधिकाऱ्यांचे वेतन कपात करुन शासकीय कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विरोधात पुकारलेले आंदोलन हे बंड समजून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या महसूल समितीचे मध्य प्रांत प्रमुख रमेश टाकळकर यांनी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदन देऊन केली असून केलेल्या कार्यवाही चा अहवाल देखील देण्याची विनंती केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आचारसंहितेदरम्यान घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाने चौकशी करावी; अनंत गाडगीळ

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…

5 तास ago

शेतकरी कर्जमाफी फसवी; सर्वपक्षीय बैठक बोलवा; विजय वडेट्टीवार

नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…

5 तास ago

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर समर्थ पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व; सर्व १४ जागांवर विजय

मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…

5 तास ago

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त राज्यभर जनजागृती व नेत्र चिकित्सा शिबिरे; चंद्रकांत पाटील

मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…

5 तास ago

एनडीए बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन ११ जूनला

षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…

5 तास ago

भारतातील आर्थिक-राजकीय संकटे! वास्तव आणि परिणाम विषयावर काँग्रेसचे चर्चासत्र १३ जूनला

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त…

5 तास ago