शिरुर (किरण पिंगळे-शेलार) जागतिक रक्त संक्रमणामध्ये रक्तदानाची चळवळ महत्वपूर्ण ठरत आहे. रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने (१४ जुन) रोजी जागतिक रक्तदाता दिवस साजरा करण्यात आला.
द्रव्यदानं परम दानम्
अन्नदानं ततोधिकम्
ततः श्रेष्ठ रक्तदानम्
या चरकांच्या शास्त्राप्रमाणे जीवनदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्त म्हणजे जीव असे सुश्रुताचार्यांनी म्हटले आहे. रक्तदानाचे पुण्य फार मोठे आहे. त्यामुळे अगदी सामान्य व्यक्तीही रक्तदान करुन दुसर्याचा जीव वाचवु शकते. शिरुर शहरात सर्वात जास्त वेळा ज्यांनी रक्तदान केले. त्यांचा रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने श्रीफळ ,गुलाब पुष्प व शाल देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी शिरुर शहरातील निलेश खाबिया यांनी ६८ वेळा, त्यांच्या पत्नी वैशाली खाबिया यांनी १५ वेळा, मीत खाबिया १० वेळा आणि अनिल बांडे यांनी ६२ वेळा रक्तदान केल्याने त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ‘आम्हा सर्वांना रक्तदानाचे शतक करावयाचे असल्याचे’ निलेश खाबिया यांनी यावेळी सांगितले. तसेच रक्तदानाची शंभरी पुर्ण करण्याचाही संकल्प केला असल्याचे यावेळी खाबिया म्हणाले.
१४ जुन हा जागतिक रक्तदाता दिवस म्हणुन साजरा केला जातो . जे लोक स्वतःच्या इच्छेने रक्तदान करुन दुसऱ्याला जीवनदान देतात. त्यांचे आभार मानणे आणि नवीन लोकांना रक्तदानासाठी प्रवृत्त करणे असे या दिवसाचे उद्दिष्ट ठरवलेले आहे. रक्तदान केल्यास आपणास काहीही त्रास होत नाही. हे सांगणेही आवश्यक आहे. सुरक्षित रक्त रुग्णाला मिळवून देण्यासाठी स्वैच्छिक रक्तदान महत्वाचे ठरते आहे.
काही वर्षांपुर्वी कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना तसेच आजकाल धकाधकीच्या जीवनात बर्याच वेळा छोट्या-मोठया अपघातात, ऑपरेशनच्या वेळी, रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज असते. त्यावर रक्तदान हाच एक उपाय आहे. आणि तो आपण करु शकतो.
मी स्वतः आजपर्यंत १३ वेळा रक्तदान केले आहे. तसेच यापुढेही नेहमी रक्तदान करत रहाणार असुन त्यामुळे आजच्या दिवशी कोणतीही अपेक्षा न करता दर तीन महिन्यांनी मी रक्तदान करेन असा संकल्प करावा असे आवाहन रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी केले.
यावेळी डॉ स्मिता कवाद, गीता आढाव, अनुपमा दोषी, शितल शर्मा व मान्यवर उपस्थित होते. या सर्वांचे रामलिंग महिला उन्नती संस्थेच्या वतीने राणी कर्डिले यांनी आभार मानले.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…