शिरूर तालुका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिरुर-आंबेगाव तालुकाध्यक्षपदी नानासाहेब लांडे यांची निवड

रांजणगाव गणपती (तेजस फडके) येथील नानासाहेब भाऊसाहेब लांडे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिरुर-आंबेगाव तालुकाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. मनसेचे नेते राजेंद्र (बाबु) वागसकर, मनसेचे राज्य सरचिटणीस अजय शिंदे तसेच मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पञ देण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार नानासाहेब लांडे यांची शिरुर-आंबेगावच्या तालुकाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय धोरणे आणि तत्वे आदी संघटनेत व समाजात निष्ठेने राबवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे नानासाहेब लांडे यांनी सांगितले.

नानासाहेब लांडे यांनी यापुर्वी मनसेच्या चिञपट सेना व कामगार सेनेच्या माध्यमातून भरीव अशी कामगिरी केली आहे. तसेच रांजणगाव परिसरात किल्ले बनवा स्पर्धा, भजन स्पर्धा, लहान मुलांसाठी ऐतिहासिक चिञपटांचे मोफत शो तसेच रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील विविध कंपन्यांच्या कुशल व अकुशल कामगारांना न्याय मिळण्यासाठी ही नानासाहेब लांडे यांनी काम केले आहे. माझ्या या सामाजिक कामामुळेच पक्षाने माझ्यावर ही जबाबदारी दिली असल्याचे नानासाहेब लांडे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…

9 तास ago

बंगालमध्ये तृणमूल पिछाडीवर! वाघासारखं लढत राहू;  ममता बॅनरजी यांची प्रतिक्रिया

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…

9 तास ago

भोर नसरापूर प्रकरण! आरोपीला फाशीचीच शिक्षा होणार;  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर…

9 तास ago

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपावर काँग्रेसचा हल्लाबोल; सपकाळांचा गंभीर आरोप

मुंबई: काँग्रेस आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत होती, मात्र २०१४ नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर…

9 तास ago

नातं हृदयाशी; बायपास सर्जरी

बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…

13 तास ago

दक्षिणेत भाजपाला नकार, केरळमध्ये काँग्रेसचा विजय लोकशाहीचा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर…

13 तास ago