शिरूर तालुका

धर्मांतराच्या विरोधात शिरूरमध्ये सकल हिंदू समाजाचा एल्गार; धर्मांतरबंदी कायद्याची जोरदार मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): सांगली येथील यशवंतनगरमधील सात महिन्यांची गर्भवती महिला ऋतुजा सुकुमार राजगे हिच्या ख्रिश्चन धर्मांतरणाच्या दबावाखाली आत्महत्येच्या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर व शिरूर तालुक्यातील वाढत्या धर्मांतराच्या घटनांना विरोध करण्यासाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीने शिरूर शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाची सुरुवात शिरूर येथील बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. महिलांचा लक्षणीय सहभाग या मोर्चात दिसून आला. ‘प्राण सोडला पण धर्म नाही सोडला’, ‘धर्मांतर बंदी कायदा करा’, ‘हिंदूंचे धर्मांतर थांबवा’ अशा आशयाचे फलक, तसेच छत्रपती शिवाजी महाराज व ऋतुजा राजगे यांचे छायाचित्र हातात घेऊन कार्यकर्ते जुन्या पुणे-अहिल्यानगर मार्गे मोर्चा काढत शिरूर तहसील कार्यालयावर दाखल झाले.

शिरूर तहसील कार्यालयात तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर झालेल्या सभेत आमदार महेश लांडगे, ह.भ.प. संग्राम बापू भंडारे, भाजप प्रदेश सचिव अॅड. वर्षा डहाळे, नानाजी पडळकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले.

“राज्यात धर्मांतरबंदी कायदा तात्काळ लागू व्हावा”; आमदार लांडगे यांची आग्रही मागणी…

या वेळी आमदार महेश लांडगे यांनी, “राज्यात धर्मांतरबंदी कायदा लागू करण्यासाठी मी विधानसभेत आवाज उठवणार आहे. हा कायदा कडक असावा व देशातील इतर राज्यांनाही प्रेरणा मिळावी अशी आमची अपेक्षा आहे,” असे स्पष्ट केले.

महिला आयोगावर टीका..

अॅड. वर्षा डहाळे यांनी महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर भाष्य करत, “ऋतुजा राजगे यांचा मृत्यू इतका गंभीर असूनही महिला आयोगाने अजूनही कोणतीही दखल घेतलेली नाही. महिला आयोग झोपेत आहे का?” असा थेट सवाल उपस्थित केला. या मोर्चात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, शिवबा संघटना, सकल हिंदू समाज, विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या प्रसंगी सभेचे प्रास्ताविक नामदेव घावटे यांनी केले. निवेदन सादर व सूत्रसंचालन गणेश पवार यांनी तर आभार प्रदर्शन संग्राम भंडारी यांनी केले.

अनधिकृत चर्च पाडण्याचा अल्टिमेटम…

“शिरूर तालुक्यातील काठापूर, पिंपरखेड, जांबुत, टाकळी हाजी व इतर भागांतील अनधिकृत चर्च पुढील तीन महिन्यात हटविण्यात यावेत. हिंदू समाजातील व्यक्तींवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे, अन्यथा मला विधानसभेत उभं राहून बोलावं लागेल. सध्या विनंती करतो, पुन्हा ती संधी देणार नाही,” असा इशारा आमदार महेश लांडगे यांनी प्रशासनाला दिला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबईत हरवलेली चिमुरडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…

17 तास ago

प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर अ.भा.वि.प.चा संताप; जबाबदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…

17 तास ago

‘आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही’! होमगार्डचा आक्रोश; ४० हजार कुटुंबांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…

17 तास ago

साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या बदल्यांवर वाद; शिवसेनेची चौकशीची मागणी

मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…

17 तास ago

एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…

17 तास ago

काँग्रेसचे ‘पुतना मावशीचे प्रेम’; महिलांच्या प्रश्नांवर दुटप्पी भूमिका; डॉ. नीलम गोऱ्हे

महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…

17 तास ago