शिरुर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखाधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे अर्धा डझन तक्रारी वरिष्ठांकडे देण्यात आल्या असून त्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
टाकळी हाजी सह १४ गावांसाठी ही बँक एक महत्वाचा घटक आहे. विशेष करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. तसेच शेतकी अधिकारी नसल्याचे कारण दिले जाते, अशाप्रकारे ग्रामपंचायत टाकळी हाजी, ग्रामपंचायत माळवाडी, ग्रामपंचायत वडनेर खुर्द, शेतकरी संघटना, बळीराजा संघटना आणि शिवबा संघटने कडून बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे.
टाकळी हाजी तील शाखेमध्ये परिसरातील मोठ्या प्रमाणात खातेदार असून शाखाधिकारी हे सहकार्य करणे तर सोडाच, परंतु खातेदारांची पिळवणूक करत असून त्यामुळे खातेदारांना, नागरिकांना मनस्ताप होत आहे. या शाखाधिकार्याची त्वरित बदली व्हावी, अशा प्रकारची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आल्याचे टाकळी हाजी चे सरपंच अरुणा घोडे, माळवाडीचे सरपंच सोमनाथ भाकरे, वडनेर चे सरपंच शिल्पा निचित, शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, बळीराजा संघटनेचे तालुका अध्यक्ष सोनभाऊ मुसळे, शेतकरी संघटनेचे माऊली ढोमे यांनी सांगितले.
मुंबई: देशातील प्रतिष्ठित पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या Mumbai Press Club ने आपल्या तीन सदस्यांची हकालपट्टी…
मुंबई: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे, सेवांचा…
सोशल मीडियातून मैत्री करून लॉजवर नेऊन अत्याचार; अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप, १५ हून अधिक…
मुंबई: राज्यातील कामगार क्षेत्रातील कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण…
मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथून कुटुंबासह मुंबईत पर्यटनासाठी आलेली ८ वर्षीय अनाबिया सुलतान मुस्ताक शेख ही…
मुंबई: गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात…