शिरूर तालुका

शिरूर तालुक्यातील त्या भागात एकाच रात्री पाच शेतकऱ्यांच्या कृषी पंप व केबलची चोरी

शेतकऱ्यांची पोलिसांना गांभीर्याने तपास करण्याची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): बेट भागात विद्युत मोटार चोरटयांनी पुन्हा एकदा धुमाकुळ घातला असून एकाच रात्री तब्बल 5 शेतकऱ्यांच्या कृषी पंप व केबलची चोरी केल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

घोडनदी परिसरातील विद्युत पंप व केबल चोरीच्या उपद्रवामुळे सध्या सर्व बाजूंनी आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भूर्दंड व मनःस्तापास सामोरे जावे लागत आहे. बुधवारी (दि. १२) रात्री निमगाव दुडे (ता. शिरुर) परिसरातील भाऊसाहेब चंदर दाते, प्रभाकर गेणभाऊ रावडे, शिवनाथ गेणू रावडे, दशरथ रामभाऊ शिंदे, सुमित भानुदास कांदळकर या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची एकाच रात्री चोरी झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. पोलिसांनी शेतकऱ्यांचा विषय गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे मत कवठे येमाईचे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब घोडे, अविनाश पोकळे व परीसरातील शेतकऱ्यांनी यांनी व्यक्त केले.

शिरुर तालुक्याच्या बेटातील टाकळी हाजी – कवठे येमाई परिसरातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा हंगाम अत्यंत खडतर ठरत असून या वर्षी कडक उन्हाची झळ लवकरच बसण्यास सुरुवात झाली आहे. अशाही परिस्थितीत मेहनतीने आणि धैर्याने शेतातील पिके जागविण्याचा प्रयत्न करत असताना आर्थिक संकटात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना आता चोरांकडून कृषी विद्युत पंप व केबल चोरीचे प्रकार वाढल्याने मोठा आर्थिक फटका बसत आहे.

बी बियाणे, खते, औषधे, डिझेल, पेट्रोलचे वाढलेले बाजारभाव त्याचबरोबर पाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष , विजेचा सततचा लपंडाव, सातत्याने बदलणारे हवामान , बिबट्याची दहशत अशा सर्वच बाजुंचा सामना करताना शेतकरी मेटाकुटीस आलेले आहेत आणि अशा परिस्थितीत भुरट्या चोरांचा शेती साहित्य चोरण्याचा उपद्रव सुरु झाल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.

टाकळी हाजी, निमगाव दुडे, माळवाडी, म्हसे, कवठे येमाई, मलठण या परिसरात बिबट्यांच्या मोठा वावर असल्याने पशुधन वाचविण्या बरोबरच आपण जगायचे कसे ? असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. बिबट्यांच्या दहशतीने शेतकरी सूर्यास्तानंतर घरीच थांबणे योग्य समजत आहेत.याचा फायदा घेत दिवसा रेकी करून रात्रीच्या वेळी चोर डल्ला मारत आहेत. पोलीस यंत्रणेने अशा सराईत चोरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी निमगाव दुडेचे माजी सरपंच दिपक दुडे, अमोल घोडे यांनी केली आहे.

अनेक शेतकरी अर्थिक अडचणीत आहेत. केबल आणि कृषी पंपाच्या चोऱ्यांनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विचार करता ही हानी भरून काढणे जिकिरीचे आहे. या चोरांचा तपास लागत नसल्याने सामान्य जनतेच्या मनात पोलिसांविषयी शंका उपस्थित होत आहे तर चोर पकडले जात नसलेने चोरांचे मनोबल मात्र वाढले जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

8 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

8 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

8 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

8 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

13 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

13 तास ago