शिरूर तालुका

शिरूर तालुक्यातील त्या भागात एकाच रात्री पाच शेतकऱ्यांच्या कृषी पंप व केबलची चोरी

शेतकऱ्यांची पोलिसांना गांभीर्याने तपास करण्याची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): बेट भागात विद्युत मोटार चोरटयांनी पुन्हा एकदा धुमाकुळ घातला असून एकाच रात्री तब्बल 5 शेतकऱ्यांच्या कृषी पंप व केबलची चोरी केल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

घोडनदी परिसरातील विद्युत पंप व केबल चोरीच्या उपद्रवामुळे सध्या सर्व बाजूंनी आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भूर्दंड व मनःस्तापास सामोरे जावे लागत आहे. बुधवारी (दि. १२) रात्री निमगाव दुडे (ता. शिरुर) परिसरातील भाऊसाहेब चंदर दाते, प्रभाकर गेणभाऊ रावडे, शिवनाथ गेणू रावडे, दशरथ रामभाऊ शिंदे, सुमित भानुदास कांदळकर या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची एकाच रात्री चोरी झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. पोलिसांनी शेतकऱ्यांचा विषय गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे मत कवठे येमाईचे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब घोडे, अविनाश पोकळे व परीसरातील शेतकऱ्यांनी यांनी व्यक्त केले.

शिरुर तालुक्याच्या बेटातील टाकळी हाजी – कवठे येमाई परिसरातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा हंगाम अत्यंत खडतर ठरत असून या वर्षी कडक उन्हाची झळ लवकरच बसण्यास सुरुवात झाली आहे. अशाही परिस्थितीत मेहनतीने आणि धैर्याने शेतातील पिके जागविण्याचा प्रयत्न करत असताना आर्थिक संकटात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना आता चोरांकडून कृषी विद्युत पंप व केबल चोरीचे प्रकार वाढल्याने मोठा आर्थिक फटका बसत आहे.

बी बियाणे, खते, औषधे, डिझेल, पेट्रोलचे वाढलेले बाजारभाव त्याचबरोबर पाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष , विजेचा सततचा लपंडाव, सातत्याने बदलणारे हवामान , बिबट्याची दहशत अशा सर्वच बाजुंचा सामना करताना शेतकरी मेटाकुटीस आलेले आहेत आणि अशा परिस्थितीत भुरट्या चोरांचा शेती साहित्य चोरण्याचा उपद्रव सुरु झाल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.

टाकळी हाजी, निमगाव दुडे, माळवाडी, म्हसे, कवठे येमाई, मलठण या परिसरात बिबट्यांच्या मोठा वावर असल्याने पशुधन वाचविण्या बरोबरच आपण जगायचे कसे ? असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. बिबट्यांच्या दहशतीने शेतकरी सूर्यास्तानंतर घरीच थांबणे योग्य समजत आहेत.याचा फायदा घेत दिवसा रेकी करून रात्रीच्या वेळी चोर डल्ला मारत आहेत. पोलीस यंत्रणेने अशा सराईत चोरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी निमगाव दुडेचे माजी सरपंच दिपक दुडे, अमोल घोडे यांनी केली आहे.

अनेक शेतकरी अर्थिक अडचणीत आहेत. केबल आणि कृषी पंपाच्या चोऱ्यांनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विचार करता ही हानी भरून काढणे जिकिरीचे आहे. या चोरांचा तपास लागत नसल्याने सामान्य जनतेच्या मनात पोलिसांविषयी शंका उपस्थित होत आहे तर चोर पकडले जात नसलेने चोरांचे मनोबल मात्र वाढले जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा फायरींग प्रकरणातील दोन मुख्य सराईत आरोपी साताऱ्यातून जेरबंद

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या फायरींग प्रकरणातील दोन मुख्य…

3 तास ago

जेजुरी पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेली चिमुकली सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन

संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…

5 तास ago

पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…

5 तास ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

6 तास ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे तर उपाध्यक्षपदी सुनिल जिते

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

8 तास ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

8 तास ago